जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : नागपुर जिल्ह्यातील धानपट्ट्यात १९७६ हेक्‍टरवर नुकसान

Rain Crop Damage Update : नागपुर जिल्ह्यात काढणीस आलेल्या व काढणी करून शेतात असलेल्या १,९७६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला

Team Agrowon

Nagpur News : नागपुर जिल्ह्यात काढणीस आलेल्या व काढणी करून शेतात असलेल्या १,९७६ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला असून सर्वाधिक १८५२ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान एकट्या मौदा तालुक्‍यात नोंदविली आहे.

पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यात मौदा तालुका हा सर्वाधिक धान लागवड असलेला तालुका आहे. मंगळवारी (ता.२६ नोव्हेंबर) या परिसरात १५.५ मिमि पावसाची नोंद करण्यात आली. त्याचा फटका तालुक्‍यातील १२४ गावांना बसला.

तब्बल २१५० शेतकरी यामुळे प्रभावीत होत त्यांचे १८५२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. धानाचे हे नुकसान ३३ टक्क्यांच्या प्रमाणात आहे. त्यासोबतच रामटेक तालुक्‍यातील २२ गावांच्या ६० शेतकऱ्यांचे ४६ हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान झाले.

या ठिकाणी नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. पारशिवणी तालुक्‍यातील सात तालुके बाधित आहेत. या भागातील ९८ शेतकऱ्यांचे ७८ हेक्‍टरवरील पिकाचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.

हे नुकसान देखील ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या शेतकऱ्यांच्या भरपाईचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. धानासोबतच कपाशी, तूर तसेच संत्रा बागायतदारांनाही मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसान सोसावे लागले आहे. बोंडातील कापूस ओला झाल्याने त्याची प्रत खालावणार आहे.

तुरीचा फुलोरही गळून पडला. दरम्यान, धान उत्पादकपट्ट्यात नुकसानीची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी मौदा तालुक्‍यात पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील

Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल

Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?

SCROLL FOR NEXT