Farm Pond
Farm Pond  Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond Scheme : शेततळ्याच्या धर्तीवर आता ‘मागेल त्याला कृषी’ योजनांचा लाभ

Suryakant Netke

Nagar News : ‘मागेल त्याला शेततळे’ या यशस्वी योजनेच्या धर्तीवर कृषीमधील सर्व योजनांचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ‘सार्वजनिक बांधकाम’मधून निधी देत हे रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे करण्यात येणार आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांसाठी महत्त्वाच्या असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्याने रूईछत्तीशी (ता. नगर) येथे कृतज्ञता कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, यांच्यासह श्रीगोंदा, नगर तालुक्यातील नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की साकळाई योजनेतून पस्तीस गावांतील सहा लघुपाटबंधारे, १६ पाझर तलाव, ९१ सिमेंट बंधाऱ्यांसाठी आणि १२ हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध होईल.

नगर जिल्ह्यातून समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नगरसह दुष्काळी भागाला पाणीदार करण्याचा आम्ही नियोजन केले आहे. शेती आणि शेतकरी यांच्यासाठी सरकार भरीव काम करत आहे.

कुकडी प्रकल्पातील अनेक प्रश्न मार्गी लावले. ‘मागेल त्याला शेततळे'' योजना नगर जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे यशस्वी झाली. आता या धर्तीवर कृषीच्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. राज्याच्या विविध भागांत सिंचनाच्या विविध योजना मंजूर करून शेती पाण्याखाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.

आगामी निवडणुकांची नांदी

रूईछत्तीशी येथे साकळाई उपसा जलसिंचन योजनेविषयी कार्यक्रम झाला असला तरी कार्यक्रम ‘राष्ट्रवादी’ टार्गेट आणि आगामी निवडणुकांची नांदी दिसून आली.

जे लोकप्रतिनिधी पुण्यातील पुढाऱ्यांच्या कुबड्या घेतात, त्यांना नगर जिल्ह्यात आणून कार्यक्रम घेतात ते तुमचे काय संरक्षण करणार, असे सांगून शेतकरी, सामान्य नागरिकाना न्याय मिळण्यासाठी, पुणेकरांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले ते पाणी मिळवून देण्यासाठी आगामी निवडणुकीत भाजपला सर्व जागांवर विजयी करण्याचे अवाहन केले.

पाणी येईल नेमकं कधी

नगर, श्रीगोंदा तालुक्यातील ३५ दुष्काळी गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या साकळाई जलसिंचन योजनेची चाळीस वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत बोलताना नगर तालुक्यातील एक ज्येष्ठ शेतकरी म्हणाले, की मला आठवतय तेव्हापासून या योजनेचा केवळ निवडणुकीत वापर होतोय.

योजनेला पुण्यातून पाणी मिळेल की नाही यात शंकाच आहे. आता सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली. आज कृतज्ञता व्यक्त केली, पण अजूनही योजना पूर्ण होता-होता दोन चार निवडणुका निघून जातील. मात्र पाणी नेमकं कधी येईल, हे सांगणेही अवघड आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT