Cable Theft  Agrowon
ॲग्रो विशेष

Cable Theft : दुष्काळी परिस्थितीत केबल चोरीचे नवे संकट

Farmer Issue : खटाव येथील सुमारे तीस ते चाळीस विहिरींमध्ये असणाऱ्या मोटारींच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. केबलची तसेच शेतीपंपाची वारंवार चोरी होत असल्याने या भागातील शेतकरी वैतागले आहेत.

Team Agrowon

Satara News : सध्या खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून विहिरींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीमध्ये हंडाभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये नांदोशी (ता. खटाव) येथील सुमारे तीस ते चाळीस विहिरींमध्ये असणाऱ्या मोटारींच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. केबलची तसेच शेतीपंपाची वारंवार चोरी होत असल्याने या भागातील शेतकरी वैतागले आहेत.

नांदोशी येथील धान नावाच्या शिवारातील विहिरीत असणाऱ्या पाण्यातील मोटारींच्या केबल तोडून अज्ञात चोरट्यांनी गायब केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे, तसेच हजारो रुपयांचे नुकसान ही केबल चोरीने झाले आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या असताना पोलिस प्रशासन स्वस्थ बसून असल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी तातडीने केबलची चोरी करणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी विकास थोरात यांनी केली आहे.

दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येणे अशक्य झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी महावितरणकडे मागणी केली. त्यात आता केबलची चोरी झाल्याने वीजग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

तसेच शेती सिंचनाला देखील वीजपुरवठा उपलब्ध होत नसल्याने शेतीपिकांना पाणी देता येत नसल्याने मोठे नुकसान होत आहे.

केबल चोरी रोखायची कशी?

दुष्काळी परिस्थितीमध्ये पिकांना पाणी देण्याच्या काळात चोरट्यांनी शिवारातून शेतकऱ्यांचे केबल वायर चोरून नेल्याने शेतकऱ्यांवर‎ चोरट्यांचे संकट ओढवले आहे.‎ त्यामुळे येथील शेतकरी वैतागला असून केबल चोरी रोखायची कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वारंवार केबल चोरी होत असूनही केबल चोर सापडत नाहीत, त्यामुळे शेतकरी नाराज आहे.

उन्हाळ्यात अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीमध्ये या विद्युत पंपांच्या साह्याने येथील शेतकऱ्यांनी पाणी उपसा करून परिसरातील शेती बागायती केली आहे; पण सातत्याने केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास दहा हजारांचे असे एकूण ५० हजार रुपयाचे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
विकास थोरात, शेतकरी, नांदोशी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Baramati Agriculture Development : दुबईतील परिषदेत बारामतीतील उपक्रमाची दखल

Ind-US Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांचे करयुद्ध आणि भारत

Heavy Rainfall: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नांदेडमध्ये पूरस्थिती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत संततधार

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

SCROLL FOR NEXT