Parbhani News  Agrowon
ॲग्रो विशेष

Per Capita Income : दरडोई उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजनांची गरज

Agriculture Income : परभणी जिल्ह्यात गोदावरी व तिच्या उपनद्यांमुळे चांगले जलस्रोत, जलसिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. काळी कसदार जमिनही लाभली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात गोदावरी व तिच्या उपनद्यांमुळे चांगले जलस्रोत, जलसिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. काळी कसदार जमिनही लाभली आहे. परंतु प्रामुख्याने शेतीवर आधारित लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न खूप कमी आहे.

जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शेतीपूरक पशुपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसायाकडे वळावे लागेल असा सूर जिल्हा विकास आराखडा कार्यशाळेत उमटला.

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. २६) झाले. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे प्रा. डॉ. अनुराग असावा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, गोखले इन्स्टिट्यूटच्या डॉ. चक्रवर्ती, मेहर सक्सेना, श्रीकृपा देसाई, प्रो. प्रशांत अरुण वरणकर, कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख आदी उपस्थित होते.

गावडे म्हणाले, की दरडोई उत्पन विचारात घेतले असता राज्यात परभणी जिल्ह्य खूप मागासलेला आहे. जमीन सुपीक आहे. कृषी आधारित पशुसंवर्धनातून रोजगारनिर्मितीची मोठी संधी आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय साधून राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे.

डॉ. असावा म्हणाले, की राज्यातील जीडीपीमध्ये १८ जिल्ह्यांचे योगदान केवळ २० टक्के आहे. त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश आहे, ही भूषणावह बाब नाही. जीडीपीतील रायगड, ठाणे, मुंबई, नागपूर, पुणे, पालघर या जिल्ह्यांचा वाटा ५४ टक्के तर छत्रपती संभाजीनगर, वर्धा, चंद्रपूर, सोलापूर, रत्नागिरी, सांगली, नाशिक, अहमदनगर, सातारा जिल्ह्यांचे योगदान २६ टक्के आहे.

देशमुख म्हणाले, की केवळ पारंपरिक पीक पद्धतीमुळे कृषी उत्पन्नावर मर्यादा येत आहेत. पीकपद्धतीत बदल करत फळबागांकडे वळणे गरजेचे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने मोसंबी, केशर आंबा लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. प्रशासनाने रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती द्यावी.

डॉ. नेमाडे म्हणाले, की अंड्यांसोबतच मांस, मासे, दुग्धव्यवसाय वाढीला चालना देणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांची जमीनधारणा चांगली असूनही प्रतिहेक्टरी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. दुग्धव्यवसाय, दुधावर प्रक्रिया करून ताक, दही, पनीर, बासुंदी, मिठाई आदी मूल्यवर्धित व्यवसायातून दरडोई उत्पन्नात नक्कीच वाढ होईल.

देशी गोवंशाचे संवर्धन करायला हवे. गायी-म्हशींमध्ये दुग्धक्षमता वाढीसाठी योग्य आहाराबाबत जनजागृती व्हावी. मोठे प्रक्रिया उद्योग कार्यान्वित व्हावेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, रस्ते, महामार्ग, जलसिंचनाच्या सुविधा, कालवे, जलसिंचन प्रकल्पांची कामे, बेरोजगारी प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध विभागांनी योजना प्रभावीपणे राबविण्याची गरजही उपस्थितांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT