Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : पूर्व भागात पाणीटंचाईमुळे रब्बीची लगबग

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात यंदा समाधानकारक खरीप पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र पूर्व भागातील येवला, नांदगाव, देवळा या तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या कायम होती. शेतकऱ्यांनी मुगाची तोडणी करून खरीप पोळ कांदा लागवड केली. तर आता बाजरी, मका व सोयाबीन सोंगणी करून शिवार खाली करून रब्बी कांदा लागवडीसह इतर पिकांची पेरणीची तयारी सुरू आहे.

यंदा जूनपासून पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी वापसा अवस्थेनुसार टप्प्याटप्प्याने पेरणी केली. सरासरीच्या तुलनेत चांदवड, बागलाण, निफाड, येवला, मालेगांव, कळवण, देवळा व दिंडोरी तालुक्यात पेरा यंदा वाढल्याचे दिसून आले. सुरवातीच्या पावसावर नांदगांव तालुक्यात १०० टक्के पेरा पूर्ण झाला. मात्र आता पाण्याची टंचाई काही ठिकाणी आहे. तर जिल्ह्यात सोयाबीन व मका पेरणी होती. तर बाजरी पेरा कमी झाला होता. आता या पिकांची टप्प्याटप्याने सोंगणी करून शेत खाली करून रब्बीसाठी मशागत सुरू आहे.

पाण्याची संभाव्य अडचण लक्षात घेता कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सध्या कांदा बियाण्याची खरेदी करून कांदा रोपवाटिका तयार करण्याची लगबग सुरू आहे. तर कांदा लागवडीसाठी ज्यांच्याकडे रोपे शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांकडून लेट खरीप कांद्याची लागवड सध्या सुरू झाली आहे.तर अनेक ठिकाणी आता बाजरी, सोयाबीन मळणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कुठे समाधानकारक;तर कुठे पाणी टंचाई कायम

जिल्ह्यातील २४ मोठ्या व मध्यम धरण प्रकल्पात ९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र धरणांचे लाभक्षेत्र वगळता जिल्ह्यातील पूर्व भागातील आणि गावांमध्ये सध्या विहिरींमध्ये अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. काही ठिकाणी अद्यापही विहिरींनी तर गाठला आहे. त्यामुळे एक ते दोन पाण्यावर येणाऱ्या रब्बी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. तर काही शेतकऱ्यांकडे शेततळे असल्याने त्यांच्याकडून संरक्षित पाणीसाठ्यावर कांदा लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. देवळा, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये शेतकरी नियोजन करतांना दिसून येत आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत पाऊस चांगला असला तरीही नाले नद्यांना पुर न गेल्याने पाणी पातळी नाजूकच आहे. बांध बंधारे व लहान प्रकल्प कोरडीठाक आहेत. शेतकरी तारेवरची कसरत करुन कांदा लागवड व इतर पिकांचे नियोजन करत आहे. मात्र आजही परिस्थिती हाताबाहेर आहे.अजूनही खूप मोठा पाऊस व्हावा याच अपेक्षित बळीराजा आहे. पाटपाण्याचेही नियोजन ना प्रशासनाकडून ना लोकप्रतिनिधी कडून. लक्षच नाही कोणाचे, शेतकरी वाऱ्यावर आहे.
शिवाजी पवार, शेतकरी, देवळा, जि. नाशिक
आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला आहे. परंतु काढणीच्या वेळेस पावसाने उघडीप दिल्यास पीक वाचतील. रब्बी हंगामाची बी भरण्याची तयारी चालू झाली आहे. देवनदी व छोटे मोठे नाले प्रवाहित झाल्यामुळे रब्बी हंगाम पण चांगला होईल फक्त बळीराजाच्या मालाला योग्य भाव मिळो हीच अपेक्षा.
कारभारी सांगळे, शेतकरी, वडगाव, ता. सिन्नर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT