Nana Patole on Soybean Price Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Price : सोयाबीनला ६ हजारांचा भाव मागणाऱ्या भाजपला सत्तेत येताच याचा विसर : नाना पटोले

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यासह केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असून ते धनदांडग्यांचे आहे. याआधी विरोधी बाकावर असणारे भाजप आता सत्तेत आले आहे. त्यावेळी सोयाबीन पीकाला ६ हजार हमीभाव देण्याच्या मागणीवरून भाजप सतत आंदोलन करत होते. पण आता सत्तेत असणाऱ्या भाजपला आपल्याच मागणीचा विसर पडल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यासह मध्य प्रदेश आणि हरियाणातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला ६ हजार रूपये हमीभाव मिळावा, अशी मागणी करत आहेत. मध्य प्रदेश आणि हरियाणात यावरून जोरदार आंदोलने केली जात आहे. तर आता महाराष्ट्रात देखील सोयाबीनच्या दरावरून ठिणगी पडली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी आज शरद पवार गटाच्या नेतृत्वात मुंबईत मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सोयाबीन फेकून सरकारचा निषेध केला.

यावरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली आहे. पटोले यांनी. राज्यासह केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असून सरकारला शेतकऱ्यांची चिंता नसल्याचा टोला लगावला आहे. तसेच राज्यासह केद्रातील सरकार हे धनदांडग्यांच असून सरकार फक्त यांच्यासाठीच काम करत आहे. राज्यात यंदा दुष्काळ होता. त्यात आता अतिवृष्टीमुळे धान, कापूस, फळभाज्या अशा सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. पण सरकारला सर्वे करायला देखील वेळ नाही, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हेच भाजपवाले विरोधी बाकावर होते. तेव्हा सोयाबीन पीकाला ६ हजार हमीभाव द्या अशा मागणी करत आंदोलन करत होते. पण आता सत्तेत असणाऱ्या भाजपला आपल्या मागणीचा विसर पडला आहे. आता सत्तेत बसून सोयाबीनला ४ हजार भाव दिला जात आहे. डिझेलचे भाव, खतांचे भाव, बी बियाणे महाग झालेत. पण सोयाबीनचा भाव काही वाढत नाही. यामुळेच शेतकरी संकटात आला आहे. तर आज याचा उद्रेक मंत्रालयाच्या प्रवेशावर झाला. येथे तरूण शेतकऱ्याने सोयाबीन मंत्रालयासमोर ओतून आपला सरकारविरोधात राग व्यक्त केल्याचे पटोले म्हणाले.

६४ हजार बहिणींचे काय झाले?

एकीकडे राज्य सरकार लाडकी बहिणी योजनेचा मोठा गवगवा करत आहे. जाहिरातबाजी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील एका वर्षात सुमारे ६४ हजार मुली, महिला बेपत्ता झाल्या. त्या लाडक्या बहिणींचे काय झाले? असा सवाल पटोले यांनी सरकारला केला आहे. सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

तसेच महिला बेपत्ता प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले असता राज्य सरकारने त्याचे उत्तर देणे टाळले. विधानसभेत देखील जेव्हा हा प्रश्न मांडला तेव्हा राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी पळ काढला. भंडाऱ्यात डब्बे वाटपाच्या कार्यक्रमात महिलांवर लाठीचार्ज केला. महिलांना मारण्याचा अधिकार फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे का? असा सवाल देखील पटोले यांनी यावेळी केला. तर नाना पटोले यांनी सध्याचे राज्यातील सरकार हे महिला विरोधी असल्याचीही टीका केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Birsa Munda anudan Scheme : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून मिळणार बैलगाडी, ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुदान; जुन्या निकषांतही बदल

Soybean Procurement : ई-समृद्धी पोर्टलवर सोयाबीन खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांनी की खरेदी केंद्रांनी करायची?

Tur Stock Limit : तूर, हरभऱ्यावरचे स्टाॅक लिमिट काढले; नवी तूर बाजारात येण्याच्या आधी स्टाॅक लिमिट काढल्याने दिलासा

Amravati Zila Parishad : अमरावती जिल्हा परिषदेत विधानसभा च्या तोंडावर, अधिकाऱ्यांची कमतरता

Crop Insurance Compensation : विमा कंपनीच्या पोर्टल बंदमुळे पूर्वसूचना थांबल्या

SCROLL FOR NEXT