Soil Erosion Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Erosion : मातीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना गरजेच्या

Soil Health : हवामानातील बदलांचा मातीच्या भौतिक तसेच जैवरासायनिक गुणधर्मावर परिणाम झाला आहे. शेतीसाठी मातीचे आरोग्य अबाधित राखणे आवश्यक झाले आहे.

Team Agrowon

Parbhani News : हवामानातील बदलांचा मातीच्या भौतिक तसेच जैवरासायनिक गुणधर्मावर परिणाम झाला आहे. शेतीसाठी मातीचे आरोग्य अबाधित राखणे आवश्यक झाले आहे. मातीची भौतिक, रासाईच, जैविक धूप थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त ‘अॅग्रोवन’शी बोलताना डॉ. वैद्य म्हणाले, की जागतिक अन्न व कृषी संघटनेतर्फे (एफएओ) थायलंडचे राजे “भूमी बोल” यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो. दरवर्षी वेगवेगळ्या थीमद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाते.

या वर्षीचे (२०२४) थीम मातीची काळजी घेणे ः मापन, लक्ष ठेवणे, व्यवस्थापन (केअरिग फॉर सॉइल्स ः मेझर्स, मॉनिटर, मॅनेज) हे आहे. त्यानुसार जमिनीतील अन्नद्रव्यांचे मोजमाप करून त्यावर सातत्याने लक्ष ठेवून व्यवस्थापन करणे शेतीसाठी गरजेचे झाले आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये कमी वेळेत जोरदार पाऊस पडत आहे. सुपीक माती वाहून जाऊन जमिनीची भौतिक होत आहे.

खोल काळ्या प्रकराच्या जमिनीत रासायनिक धूप होत असल्याचे आढळून येत आहे. जोरदार पावसामुळे काळ्या जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी रहाते. कॅल्शिअमचे रूपांतर अनुपलब्ध कॅल्शिअममध्ये होते. जमीन कडक होते. सोडिअमचे प्रमाण वाढते. पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत.

कठीण पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास जमिनी क्षारयुक्त होत आहेत. तापमानात वाढ झाल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण तसेच जिवाणूंची संख्या कमी होत आहे. जमिनीचा भुसभुशीतपणा कमी झाला आहे ही जैविक धूप आहे. याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर झाला आहे.

उपाययोजना...

भौतिक धूप रोखण्यासाठी शेत जमिनीची बांधबंदिस्ती करणे आवश्यक आहे. उताराला आडवी पेरणी करावी. रासायनिक धूप कमी करण्यासाठी काळ्या जमिनीमध्ये जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी (बीबीएम) तंत्राने पेरणी करावी.

एका आड एक सरी ओढावी. रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करावा. जैविक धूप थांबविण्यासाठी पेरणीपूर्वी तसेच पेरणीच्यावेळी सेंद्रिय घटक, खतांचा उपयोग केल्यास जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते. पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जमिनीत हवा खेळती राहते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

सुदूर संवेदन व भौतिक माहिती प्रणाली प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील जमिनीचे प्रकार, जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. विश्‍लेषण केले जात आहे. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, अन्नद्रव्ये व्यवस्थापनाच्या शिफारशी करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.
- डॉ. प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख, मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, वनामकृवि, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT