Raju Shetti Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti : 'अपयश आले म्हणून खचून जाणारा मी नाही'; शेतकऱ्यांसाठी काम करत राहणार : शेट्टी

Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी बारामतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक घेतली.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : काहीच दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर शेट्टी पुन्हा एकदा कामाला लागले आहे. यावेळी त्यांनी, निवडणुकीत अपयश आले म्हणून काय झालं. मी खचून जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी काम करत राहणार असल्याचे म्हटले आहे. बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी (ता.२२) शेट्टी बोलत होते.

यावेळी सतीश काकडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व जालंदर पाटील, डॉ. प्रकाश पोपळे, सतीश काकडे, सावकर मादनाईक, घनशाम चौधरी, गजानन बांगळे पाटील, राजेंद्र ढवाण पाटील, प्रकाश बालवडकर, अमर कदम, दामू इंगोले, प्रशांत डिक्कर, अनिल पवार, प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते.

बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीस शनिवारपासून सुरूवात झाली. यावेळी शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आपण कायम काम करत आलो असून पुढे काम करणार आहोत. यापुढे देखील शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी सावलीसारखा उभा राहीन. निवडणूक लढविणे हा अंतिम उद्देश नसून आपण कुठे चुकलो याचा विचार आता करायचा आहे. तर पुढील राजकीय दिशा निश्चित करायची असल्याचेही शेट्टी यांनी नमूद केले.

यावेळ शेट्टी म्हणाले, केंद्र व राज्याच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला दिवसा वीज मिळायला हवी. मात्र सरकार गंभीर नाही. धरण, जमीन व पाणी शेतकऱ्याचे असूनही त्यालाच वीजच मिळत नाही. उसाच्या एफआरपीचा कायदा मोडीत काढण्याचे मोठे पाप महाविकास आघाडीने केले. त्याच्या या पापामुळेच आज हजारो कोटींची एफआरपीची रक्कम थकली आहे. सोयाबिन, शेतीमाल, कांदा, दुधाला भाव नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय. मुला-बाळांची लग्न जमेनात. तर विकासाच्या नावाखाली शेतजमिनींचे अधिग्रहण केले जात आहे. उद्योगपतींना सवलती दिल्या जातात.

यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंथन केले.

फक्त निवडणूक हे आमचे उद्दिष्ट नसून चळवळ जगली पाहिजे. पराभवानंतरही माझ्यासोबत अनेक जिवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी (ता. २३) निर्णय घेऊ. शेतकरी चळवळ अधिक जोमाने पुढे नेण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
- राजू शेट्टी, माजी खासदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT