Sangli Krushna River Pollution : सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यात मागच्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील उद्योगांनी वाहत्या पाण्यात मळी सोडून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पुन्हा दूषित झाले आहे. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यात पावसाने झोडपून काढले. ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. या ओढ्याच्या वाहत्या पाण्याची संधी साधत करखान्यानी मळी सोडली. मळीने वाहते पाणी काळेकुट्ट बनले. हे दूषित पाणी थेट कृष्णा नदीपात्रात मिसळले. नदीचे पाणी दूषित बनले आहे. सध्या नदीपात्रात पाणी जेमतेम आहे. हे सगळे पाणी दूषित बनले.
नदीतील अनेक जीवजंतू या दूषित पाण्याने मृत्युमुखी पडले. हेच पाणी कृष्णा नदीकाठावरील अनेक गावांना पिण्यासाठी वापरले जाते. पर्यायाने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोकादायक बनले आहे. जर वेळी पाणी वाढले पाऊस पडला, की ही संधी साधत कारखानदार मळी पाण्यात सोडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळतात.
प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्व उघड्या डोळ्यांनी पाहून कोणतीही कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. कारखानदार लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणताही मुलाहिजा न ठेवता मळी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.