Jaggery Market
Jaggery Market Agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery market : पिवळाधम्मक गुळ आरोग्यासाठी चांगला असतो का?

Team Agrowon

भारतीय जेवणात गुळाचा (Jaggery) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतातून मोठ्या प्रमाणात गुळाची निर्यातही होते. चांगला गुळ कसा ओळखावा, हा प्रश्न ग्राहकांना पडतो.

कारण बऱ्याच वेळा पिवळाधम्मक गुळ खरेदी केला जातो. तो नंतर मात्र खराब निघतो. गुळाला पाणी सुटते, बुरशी लागते. 

गुळाची प्रत (Jaggery Quality) आणि रंग ठरतो उसाच्या जातीवरून. कारण उसाच्या रसात अनेक रासायनिक गुणधर्म असतात.

उसाच्या जातीनुसार या गुणधर्मांत फरक आढळून येतो. त्याचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होतो. म्हणून गुळासाठी शिफारस केलेल्या ऊस जातींची निवड करावी.

गुळाला आकर्षक रंग यावा म्हणून अनेक वेळा रसायनांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे गुळाला पाणी सुटणे, बुरशी लागणे या सारख्या समस्या उद्भवतात. 

बाजारात ग्राहक गुळ खरेदी करताना त्याचा रंग कसा आहे, हेच पहिल्यांदा बघतो. गुळाला मिळणारा भाव हा कमी-अधिक प्रमाणात रंगावर अवलंबून आहे.

त्यामुळे गुळ उत्पादक बऱ्याच वेळी गुळाला गडद पिवळा रंग येण्यासाठी हैड्रॉस, वाफा पावडर, भेंडी पावडर इ. रासायनिक पदार्थांचा अतिरिक्त वापर करतात.

हे रासायनिक पदार्थ मानवी आरोग्याला  हानिकारक आहेत. या पदार्थांमुळे गुळातील गंधकाचं प्रमाण वाढतं. 

अन्न भेसळ कायद्यानुसार गुळामध्ये सल्फरडाय ऑक्साईडच प्रमाण ७० भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) पेक्षा जास्त असू नये.

हैड्रॉसच्या अतिवापरामुळे सोडीयमचं प्रमाण वाढते. त्यामुळे हवेतील बाष्प गुळात शोषले जातात. त्याचा परिणाम म्हणजे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढताच गुळाला पाणी सुटते आणि त्यात बुरशीची वाढ होते.

असा गुळ खाण्याच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणून गुळ तयार करताना रासायनिक पदार्थांचा अतिवापर टाळणंच हितकारक आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT