Buldhana News : जळगाव जामोद उपविभागात २२ जुलै २०२३ ला ढगफुटीसदृश पावसामुळे जमीन खरडून गेली होती. त्यात शेतजमिनीसह पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानाची अद्यापही भरपाई मिळालेली नाही. ज्यांना दिल्या गेली ती मदतही अपुरी आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवार (२९ फेब्रुवारी) पासून जळगाव जामोद येथे जनावरांसह उपोषण सुरु केले.
जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण व शिवारातील ज्ञानेश्वर खिरोडकार, विठ्ठल घुले, विनोद जाधव यांच्यासह इतर शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, जुलै २०२३ मधील नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालयात अनेकवेळा निवेदने दिली. त्यावर काहीही झाले नाही.
सन २०२२ मधील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी. एखाद्या शेतकऱ्याचे दोन शिवारात शेती असेल व एका शिवारातून त्याला नुकसानाची तुटपुंजी मदत मिळाली तर शासनाने त्यास ई-केवायसी करायला सांगितले.
दुसऱ्या शिवारात संपूर्ण शेती खरडून गेली तेव्हा त्याला असे सांगण्यात आले की तुम्ही एका शिवारात लाभ घेतला असल्यामुळे दुसऱ्या शिवारात आपणास लाभ देता येणार नाही. हा नियम शासनाने कधी तयार केला हे सांगावे. तरी शासनाने झालेल्या पंचनाम्यानुसार भरपाई द्यावी. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
पीक नुकसानाचे पंचनामे करूनही मदत दिली गेली नाही. ज्यांना मिळाली ती तुटपुंजी आहे. महिनोमहिने शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. आता संयमाचा बांध सुटत आहे. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घ्यायला हवी.प्रसेनजित पाटील, सभापती, बाजार समिती, जळगाव जामोद, जि. बुलडाणा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.