Food grain Agrowon
ॲग्रो विशेष

Food Grain Production : धान्य उत्पादनाची आकडेवारी जाहीर| अवकाळी पावसाने दिला फटका! |राज्यात काय घडलं?

Dhananjay Sanap

आठव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठव्या दिवशीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. मागील ८ दिवसात आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रशासनासोबत पाच बैठका पार पडल्या. पण तरीही त्यातून तोडगा निघालेला नाही. कांद्याला हमीभाव द्या, वनजमीन कायद्याची अंमलबजावणी करा, कर्मचाऱ्यांची पेन्शन यासह विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. आंदोलकांचं शिष्टमंडळानं मंत्र्यांशी मुंबईत बैठक केली होती. पण या बैठकीत फक्त आश्वासनं देण्यात आली होती. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि माजी आमदार जे पी गावीत यांनी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली. सोमवारी (ता.०४) प्रशासनाने बैठक आयोजित केली आहे. 

जागतिक व्यापार परिषदेवर समाधानी- गोयल

अनेक नाट्यमय घडामोडी नंतर सहाव्या दिवसापर्यंत लांबलेली जागतिक व्यापार संघटनेची परिषद शनिवारी रात्री संपली. यानंतर वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. जागतिक व्यापार संघटनेच्या १३ व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या बैठकीत चांगले निर्णय घेण्यात आले. या बैठकीतील चर्चेवर भारत पूर्णपणे समाधानी असल्याचा दावा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी केला आहे. "शेतकरी, मासेमारे करणाऱ्यांच्या हितासाठी धोरण कायम ठेवलं आहे. पण कृषी आणि मत्स्यपालन अनुदानासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर डब्ल्यूटीओ सदस्यांचे एकमत झालं नाही. त्यामुळे २९ फेब्रुवारी रोजीनंतर पुन्हा एकदा यावर चर्चा करण्यासाठी  एक दिवस वाढवण्यात आला होता. मात्र तरीही सार्वजनिक अन्नधान्याच्या साठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि मत्स्यपालन अनुदानावर अंकुश लावणे यासारख्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय झाला नाही, अशी माहिती गोयल यांनी दिली. 

धान्य उत्पादनाचे आकडे काय सांगतात?

केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात २०२३-२४ मधील धान्य उत्पादनाचे आकडे जाहीर केले आहेत. या आकडेवारीनुसार खरीप हंगामात देशात १५४ दशलक्ष टन तर रब्बी हंगामात १५५ दशलक्ष टन धान्य उत्पादित झाल्याचा कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचा दावा आहे. परंतु दुष्काळ, अतिवृष्टि आणि किड रोगांच्या प्रादुर्भावामुळे देशातील अन्नधान्य उत्पादनात घटल्याचं जाणकारांचं मत आहे. मागील खरीप हंगामात देशातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली होती. तर काही भागात अतिवृष्टिचा तडाखाही पिकांना बसला होता. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाढत्या महागाईला ब्रेक लावण्यासाठी गहू, तांदूळ, साखर निर्यातीवर सरकारनं निर्बंध घातलेली आहेत. 

अवकाळी आणि गारपीटीचा फटका 

राज्यात अवकाळी आणि गारपीटीनं शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. शनिवारी (ता.२) जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या पिकांची माती केलीय. तसेच जालना जिल्ह्यातही वादळी वारा आणि विजासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारी, फळबागा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं. चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीनं ४१ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. याबद्दल तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी माहिती दिली. राज्यात अवकाळी आणि गारपीटीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे कासवगतीनं सुरू असल्याचं शेतकरी सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT