Flower farming Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Farming : शेतकऱ्यांनो, फळांप्रमाणे फुलशेतीही गरजेची

Fruit Orchard : फळशेतीसोबत शेतकऱ्यांनी फुलशेतीकडेही वळणे गरजेचे आहे. बाजारात मोगरा आणि सोनचाफ्याच्या फुलांना मागणी वाढत आहे. दरही चांगले मिळत आहे.

Team Agrowon

Dombavali News : फळशेतीसोबत शेतकऱ्यांनी फुलशेतीकडेही वळणे गरजेचे आहे. बाजारात मोगरा आणि सोनचाफ्याच्या फुलांना मागणी वाढत आहे. दरही चांगले मिळत आहे.

सरकारकडून अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी फळबागांसोबत फुलशेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी व्यक्त केले आहे. मांगरूळ येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात ते बोलत होते.

राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण शिबिर अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळमध्ये आयोजित केले होते. या वेळी शेतकऱ्यांना मोफत भाताचे आणि फळ भाज्यांच्या बियाण्यांचे मिनी किट वितरित करण्यात आले.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून फळबागांची सर्वाधिक लागवड केली जाते. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, चिकू, पेरू यांसह अन्य फळांची लक्षणीय लागवड केली जाते. मात्र, फळशेतीसोबत शेतकऱ्यांनी फुलशेतीचा प्रयोग केल्यास याचा अधिक नफा होणार असल्याचे कुटे यांनी सांगितले.

बाजारात सोनचाफ्याच्या एका फुलाची किंमत ही आठ ते दहा रुपयांच्या घरात असते. तर मोगऱ्याच्या फुलांची किंमत प्रति किलो १०० ते १५० रुपयांच्या घरात असते. सणासुदीच्या कालखंडात या फुलांची मागणी वाढलेली असते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे वळायला हवे, असे आवाहन दीपक कुटे यांनी केले. याप्रसंगी आमदार गणपत गायकवाड यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT: ‘डीबीटी’त चुकीची माहिती दिल्यास पाच वर्षे बंदी

Cotton Picking Wages: खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

Agricultural Loss: नऊ वर्षांत ६४० लाख हेक्टरवरील पिकांचा घास

Air Pollution: वायू प्रदूषणामुळे देशात १८ टक्के मृत्यू

Farmer Issue: कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही सावरू शकत नाही

SCROLL FOR NEXT