Sugar Export Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Export : एल निनोमुळे साखर निर्यातीचा कोटा घटणार; उत्पादनाचं चित्र स्पष्ट होईपर्यंत वाट पाहावी लागणार?

Team Agrowon

Sugar Production : देशातील माॅन्सूनवर एल निनोचे सावट आहे. एल निनोमुळे पाऊस कमी होण्याचा धोका असतो. पाऊस कमी झाल्यास देशातील साखर उत्पादनात घट होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकार साखर निर्यातीला लगेच परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे.

पुढील निम्म्या हंगामापर्यंत तरी सरकार साखर निर्यातील परवानगी देण्याची शक्यता कमीच असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. एक ऑक्टोबरला हंगाम सुरु होण्यापुर्वी केंद्र सरकार सर्व कारखान्यांना साखर निर्यातीचा कोटा ठरवून देत असते. भारतातून साखर निर्यातीस उशीर झाला किंवा कमी निर्यात झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ होत असते.

राॅयर्टसने दिलेल्या वृत्तानुसार, साखर उत्पादनावर वातारणाचा मोठा परिणाम होतो. मागीलवर्षी माॅन्सून चांगला झाला. तरीही साखर उत्पादनात घट झाली. यंदा तर एल निनोची स्थिती आहे. त्यामुळे आम्ही लवकर साखर निर्यातीला परवानगी देण्याची जोखीम घेऊ शकत नाही, असे एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

एल निनो वातावरणीय स्थितीमुळे मागील ७ दशकांमध्ये भारतात अनेकदा दुष्काळ पडला आहे. याचा परिणाम पुढील हंगामात आपल्याला जाणवू शकतो.

आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यके हंगामात साखर उत्पादनाचा अंदाज यायला किमान काही महिन्यांचा कालावधी जावा लागतो. त्यामुळे पुढील हंगामातील उत्पादनाचे चित्र स्पष्ट होईपर्यंत निर्यातीला परवानगी देण्यासाठी आम्ही वाट पाहू. निर्यातीचा विचार करता आम्हाला कोणतीही घाई नाही.

चालू साखर हंगाम सुरु होतानच उद्योगाने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत देशात ३६० लाख टन उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता. पण नंतर त्यात पुन्हा कपात करून ३२८ लाख टनांवर आणला. उत्पादन घटल्याने केंद्र सरकारने ६१ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. निर्यातीचा कोटा पूर्ण झाला असल्याने सध्या निर्यात बंद आहे.

२०२३ आणि २०२४ या दोन्ही वर्षांमध्ये आता निवडणुकांचा धुमधडाका आहे. निवडणुकांच्या तोंडावर सरकार अन्नधान्यासह साखरेचे भाव कमी ठेवले. यामुळे पुढील हंगामात साखर निर्यातीला परवानगी दिली तरी ती ४० लाख टनांपेक्षा जास्त नसेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारताने २०२१-२२ च्या हंगामात ११० लाख टन साखरेची निर्यात केली होती. ही निर्यात देशाची आतापर्यंतची विक्रमी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव ११ वर्षातील उचांकी पातळीवर आहेत. त्यामुळे अनेक देशांना भारतीय साखरेची गरज आहे.

भारताच्या साखर निर्यातील उशीरही झाला तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती आणखी वाढतील. वाढलेल्या किमतीला ब्राझीलच्या साखरेला मागणी असेल, असे एका व्यापारी संस्थेने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT