Devendra Fadnavis  Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : आम्ही शेतीप्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत कमी पडलो; निकालानंतर फडणवीस यांची कबुली

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यासह देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता.४) जाहीर झाला. या निकालानंतर भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.५) या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. तसेच राज्यात भाजपला कमी जागा मिळाल्याचे कारण सांगताना शेतकऱ्यांच्या नाराजीसह संविधान बदलणार असल्याच्या अप्रचाराचा फटका बसल्याची कबूली दिली आहे. तर राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची परवानगी देऊन पक्षाने आपल्याला मोकळे करावे अशी विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याचं फडणवीस म्हणाले. 

राज्यात निवडणुकीचा निकाल आल्यानंतर फडणवीस यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील कमी आलेल्या जागेवरून पराभवाची जबाबदारी स्वीकरली. तसेच पराभवासंदर्भात विचारमंथन करताना त्यांनी, मराठा आरक्षण, शेतीमालाचे भाव आणि संविधान बदलण्याचा मुद्दा कळीचा मुद्दा ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला सर्वाधिक फटका हा मराठवाड्यात बसला. शेतकऱ्यांचा कांद्याचा मुद्दा महत्वाचा होता. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध अडचणींमुळे सोयबिन आणि कापसाचे भाव मध्यतंरी पडले. पण त्यानंतर ते सुधारले देखील.  मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसलाच. त्यावेळी आम्ही भावांतर योजना आणली होती. मात्र आचरसंहितेचे गणित चुकले आणि आम्हाला त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देता आला नाही अशी कबूली आता फडणवीस यांनी दिली आहे. 

तसेच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा काही भागात महत्वाचा ठरला. आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यानंतरही हा मुद्दा मांडण्यात आला. तसेच विरोधकांकडून संविधान बदलणार असल्याचा प्रचार जोरात केला गेला. तो खोडून काढण्यात आम्ही अपयशी ठरल्याचे फडणवीस म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT