Nagpur News: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला हजारो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यामुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडला असताना राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून ९० हजार कोटी रुपयांची बिले थकवले आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली. कार्यारंभ आदेश मिळताच ठेकेदारांनीही जलद बिले मिळावीत म्हणून गतीने कामे केलीत. त्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले. त्यातील सर्वाधिक कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाचीच आहेत. त्याखालोखाल जलजीवन मिशन, पाणीपुरवठा विभागाचे आहेत.
कंत्राटदारांना आता बँका आणि जीएसटी विभागाकडून नोटीस बजावल्या जात आहेत. याआधी असे कधी घडत नव्हते. देणी सहा ते सात महिन्यांत मिळत होती. परंतु, आता तीन वर्षांपासूनची देणी थकीत आहेत. यातच आता दीड लाख कोटी रुपयांची कामे सरकारने काढली आहेत. आधीचेच पैसे मिळालेले नाहीत. त्यात नवीन कामे प्रस्तावित करण्यात आल्याने अडचणी वाढणार आहेत.
शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार बांधकाम क्षेत्रातून निर्माण होते. राज्य सरकारने बांधकाम व्यावसायिकांची देयके थांबविल्याने ते आर्थिक अडचणीत आलेले आहेत. शासकीय कामांची निविदा काढतानाच सरकारने त्याची प्राथमिकता ठरवणे गरजेचे आहे. त्याचा अभाव असल्यानेच अनेक कामे थांबली आहेत. त्याचा फटका कामगारांना बसतो आहे.- राजेंद्र आठवले, उपाध्यक्ष बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.