CM Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

CM Devendra Fadnavis: कापलेल्या पिकांच्या नुकसानीच्या मदतीचा विचार

Maharashtra Rainfall Damage: मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी झालेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले असून अशा नुकसानीसाठी मदतीचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील विविध भागांत नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांनाही नुकसान भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.३) सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे बैठक झाली. या बैठकीच्या सुरुवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. त्या वेळी विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत विचार करू, असे आश्वासन दिले. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरणाद्वारे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान आणि मदतीची माहिती दिली.

मंत्रिमंडळाच्या २७ मे रोजी झालेल्या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरिता निधी द्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार ४९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. कोकण विभागास पाच कोटी, पुणे विभागास १२ कोटी, नाशिक विभागास पाच कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागास १२ कोटी, अमरावती विभागास पाच कोटी आणि नागपूर विभागास दहा कोटी असे ४९ कोटी वितरित केले आहेत.

खरीप-२०२५ आणि यापुढील कालावधीकरिता केंद्र सरकार अथवा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी द्यावयाची भरपाई दर आणि निकष २७ मार्च, २०२३ रोजीच्या निर्णयानुसार देय राहतील. यामुळे एक जानेवारी २०२४ रोजीच्या निर्णयानुसार दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सेठी यांनी दिली.

या वेळी वनमंत्री गणेश नाईक आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी पावसामुळे सुक्या मासळीचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावर मदत पुनर्वसन विभागाने यावर प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

नुकसानीचा आकडा ६४ हजार ६६१ हेक्टरवर

राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसाने ६४ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

Maharashtra Health Scheme: कॅन्सर, हृदयविकार, किडनी आजारांवर आता गरीबांसाठी सरकारकडून मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा

Hingoli APMC Merger : हिंगोली, सिरसम कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे एकत्रीकरण

krushi Sakhi : कृषी सखींना लवकर मिळणार थकित मानधन

Manoj Jarange Patil: १७ सप्टेंबरच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा!

SCROLL FOR NEXT