Weather update  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather update : यवतमाळमध्ये पावसाची रिपरिप? नाशकात पाण्यासाठी आंदोलन

Aandolan for water in Nashik : वातावरणातील बदलांमुळे यवतमाळमध्ये पाऊस पडत असतानाच नाशिकमध्ये पाण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलांमुळे कुठे पाऊस पडत आहे. तर कुठे दुष्काळाचे चटके जनतेला बसत आहे. हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. तर आतादेखील विविध ठिकाणी पाऊस पडत आहे. यवतमाळमध्ये शनिवारी (ता.०२) दुपारी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान गिरणा धरणातून पाणी सोडण्याची मागणी लावून धरत पाण्यासाठी शेतकऱ्यांनी नाशिक येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. 

पावसाचा अंदाज

हवामानातील बदलांमुळे यवतमाळ गेल्या दोन दिवसापासून चांगलाच उष्मा वाढला होता. तर सकाळी ढगाळ वातावरण तयार झाल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान शनिवारी दुपारी अचानक रिपरिप अवकाळी पावसाने काही भागात हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकांचे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यातील तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता असून काही प्रमाणात पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. 

भर उन्हात रास्ता रोको 

नाशिकच्या मालेगाव तालुक्यात यंदा दुष्काळ अधिक भिषण होण्याची शक्यता असून अनेक गावांना दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. यामुळे पांझण डाव्या कालव्यातून गिरणा धरणाचे पाणी गुरांसाठी आणि पिण्यासाठी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरीकांकडून होत आहे.

याच मागणीसाठी तालुक्यातील सात गावातील नागरिकांनी मालेगाव-चाळीसगाव मार्गावर भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर पोलीस प्रशानाला निवेदन देत सहा तारखेपर्यंत पाणी सोडण्याची मुदत देण्यात आली आहे. तर पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. 

५७ टक्के जलसाठा 

मागील वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे सध्या गिरणा धरणात ५७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. हे पाणी आवर्तणासाठी मुबलक आहे असे म्हणत पांझण डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची आग्रही मागणी शेतकरी आणि नागरीकांनी केली आहे. 

हजारो लिटर पाणी वाया

यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागलेली असतानाच नाशिकमध्ये मात्र पाण्यासाठी रास्ता रोको केला जात आहे. याचदरम्यान परभणीच्या सेलू शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.

तर सेलू शहरातील रायगड कॉर्नर ते स्टेशन रोड येथील सिमेंट रस्त्याच्या कामावेळी जेसीबीने खोदकाम करताना ही पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दुधना धरणात सध्या केवल ४५ टक्के पाणीसाठा असल्याने सेलुकरांवर देखील पाणीबाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT