Chiku Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Chiku Orchard Crisis : चिकू बागायतदारांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता

Black Mold Infestation : काही भागांमध्ये अकाली फळे गळण्याचे प्रमाण तसेच फळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Team Agrowon

Palghar News : मागच्या आठ दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील चिकू बागायतदारांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील फळांचा हंगाम वाया जातो की काय, अशी भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. दरम्यान काही भागांमध्ये अकाली फळे गळण्याचे प्रमाण तसेच फळांवर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.

डहाणू तालुका चिकू फळ बागायतीसाठी ओळखला जातो. डहाणूसह पालघर आणि तलासरी तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टर जमीन क्षेत्रावर चिकू बागायती विकसित झाल्या आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत करणारा व्यवसाय असून या व्यवसायावर बागायतदारांसह शेतमजूर, बुरुड कामगार, वाहतूक व्यवसायिक, खत विक्रेते, पुठ्ठ्याचे बॉक्स तयार करणारे उद्योजक अवलंबून आहेत.

याची संख्या हजारोंमध्ये मोजली जाते. मागील चार-पाच वर्षांपासून फियान, तोत्के, बिपोरजॉय यांसारख्या महाभयंकर वादळांनी पावसाळ्यापूर्वी चिकू बागायतीवर वरवंटा फिरवल्यमुळे बागातदार मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यातच २०२१ ते २३ या तीन वर्षांच्या काळात शासनाने बागायतदारांवर अन्याय करून विम्याचा हप्ता सहा पटींनी वाढवून पंतप्रधान हंगामी पीकविमा योजनेपासून वंचित ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय खालावली आहे.

अनेक शेतकरी बागायती विकण्याच्या तयारीत आहेत किंवा शेतीत अन्य पर्याय शोधू लागले आहेत. चालू वर्षी शासनाने बागायतदारांना विम्याचा हप्ता करून पुन्हा एकदा विमा सुरक्षा कवच योजनेत सहभागी करून घेतले आहे. परंतु नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि विमा कंपनीच्या माध्यमातून लादण्यात आलेल्या काटेकोर नियमांमुळे विम्याची भरपाई मिळेलच, अशी शक्यता नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत शेतकऱ्यांचे, विविध नैसर्गिक प्रकोपांमुळे प्रचंड नुकसान होत असते मात्र बागायतदार नुकसान सहन करून बागायतीची मशागत करण्यात कोणतीही कसर ठेवत नाहीत.

चिकू फळे नाशिवंत असल्यामुळे सततच्या पावसात ती लवकर कुजतात तर फळे तोडल्यानंतर दोन दिवसांच्या आत विक्री न झाल्यास नाश पावतात. त्यामुळे या फळांच्या विक्रीसाठी शासनाने रेल्वे मार्गाद्वारे उत्तर भारतात फळे पाठवण्यासाठी खास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतु रेल्वे खात्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची तक्रार बागायतदार करीत आहेत.
प्रीत पाटील, चिकू फळ उत्पादक व व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT