Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis Maharashtra : मराठवाड्यातील ११ लघू प्रकल्प अजूनही कोरडे

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील एकूण ७५१ लघू प्रकल्पांपैकी ११ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. शिवाय पाच मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच असल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील एकूण ७५१ लघू प्रकल्पांपैकी ११ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. शिवाय पाच मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच असल्याची स्थिती आहे. प्रकल्पातील पाणीसाठा पाऊस सार्वत्रिक व अजूनही दमदार ते जोरदार स्वरूपाचा नसल्याचे दर्शविणारा आहे.

अजूनही कोरड्या असलेल्या मराठवाड्यातील अकरा लघू प्रकल्पांमध्ये जालन्यातील ५ धाराशिवमधील ४ व छत्रपती संभाजीनगर मधील २ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय तब्बल १८८ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे.

यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६, जालन्यातील २८, बीडमधील ४२, लातूरमधील १९, धाराशिवमधील २५, नांदेडमधील २३, परभणीतील १६ व हिंगोलीतील १९ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.

जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या ५ मध्यम प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व धाराशिवमधील प्रत्येकी एक, तर बीडमधील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण लघू प्रकल्पांपैकी २५३ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी १४८ प्रकल्पांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान ७६ प्रकल्पांत करण्यात ५० ते ७५ टक्के दरम्यान तर केवळ त्यांच्या तर लघू प्रकल्पांत ७५ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आतापर्यंत झाला आहे.

मध्यम ७५ प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्पांत २५ टक्के पेक्षा कमी, १८ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ११ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर केवळ ६ प्रकल्प ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.

चार जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांत अत्यल्प पाणी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पांत १४ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पात १२ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत ९ टक्के, तर हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांत सर्वांत कमी एक टक्का उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

बीड जिल्ह्यातील १२६ लघू प्रकल्पांत ३२ टक्के, लातूर मधील १३५ प्रकल्पांत २१ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्प ४० टक्के, नांदेड मधील ८० प्रकल्पांत ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

जालन्यात मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी पाणी

मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी ९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. परभणीतील दोन मध्यम प्रकल्पांत १२ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांत १८ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ४९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत १७ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ४३ टक्के नांदेडमधील ९ प्रकल्पांत ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

SCROLL FOR NEXT