कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५० ते १६० रुपये
कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५० ते १६० रुपये 
बाजारभाव बातम्या

कोल्हापुरात टोमॅटोला प्रति दहा किलोस ५० ते १६० रुपये

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोची १३६० कॅरेट आवक होऊन त्यास प्रति दहा किलोस ५० ते १६० रुपये इतका दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसापासून उन्हाळा वाढत आहे. कोल्हापूर बाजार समितीत स्थानिक भागाबरोबरच सांगली जिल्ह्यातील विटा, कवठेमहांकाळ या तालुक्यातून काही प्रमाणात टोमॅटोची आवक होत आहे. सध्या या भागात उन्हाळा जास्त असल्याने उन्हामुळे टोमॅटो पिकू लागले आहेत. जास्त पिकून नुकसान होऊ नये, यासाठी अनेक शेतकरी टोमॅटोचा तोडा जास्त प्रमाणात करत असल्याने टोमॅटोच्या आवकेत काहीशी वाढ असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

गवार, ओला वाटाणा कारल्याची आवक कमी झाली आहे. पाणीटंचाईमुळे या पिकांची वाढ आवश्यकत त्या प्रमाणात होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गवारीची २० पोती आवक झाली. तिला दहा किलोस २०० ते ३१० रुपये दर मिळाला. ओला वाटाण्याची ७० पोती आवक झाली. कारल्याची ६७ पोती आवक झाली. भेंडीची १२६ करड्या आवक झाली. तिला प्रतिदहा किलोस १०० ते ३०० रुपये दर मिळाला. 

हिरव्या मिरचीची ४४५ पोती आवक झाली. या मिरचीस दहा किलोस १८० ते ४१० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची २६००० पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ४०० ते १२०० रुपये इतका दर मिळाला. लग्नसराईमुळे कोथिंबिरीच्या दरात सुधारणा झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT