कांद्याच्या बाजारभावात सुधारणा
कांद्याच्या बाजारभावात सुधारणा 
बाजारभाव बातम्या

कांद्याच्या बाजारभावात सुधारणा

सकाळ वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्‍यात कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्रीला काढण्याची लगबग सुरू आहे. सध्या १५ रुपये किलो बाजारभावाने कांद्याची व्यापारी खरेदी करत आहेत. शेताच्या बांधावर व कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. दुष्काळी परिस्थितीतही जवळपास चार हजार एकर क्षेत्रात कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले होते. 

हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदी, उजवा, डावा कालवा, घोड शाखेला कालवा, घोड नदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदी ठिकाणी शाश्‍वत पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी तसेच बंधारे व कालव्यांच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले होते. 

चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, नांदूर, कळंब, चांडोली बुद्रुक, एकलहरे, सुलतानपूर, वडगाव काशिंबेग आदी गावांतील शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून फेब्रुवारी, मार्च महिन्यांत तीन ते चार रुपये किलो बाजारभाव असल्यामुळे शेताच्या बांधावर किंवा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता. बाजारभावात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

आंबेगाव तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. एक एकर क्षेत्रात कांद्यांची रोपे, लागवड, खते औषधे, मजुरी असा सरासरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. चार महिन्यानंतर सरासरी बारा ते १४ टन कांदा उत्पादन निघते. या वर्षी कांदा पिकाला हवामान अनुकूल ठरल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. 

बाजारभावातील चढ-उतारानुसार एक नंबर गुणवत्तापूर्ण कांद्याला मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सरासरी १५ रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे साठवणूक केलेले कांदे विक्रीसाठी काढले आहेत, अशी माहिती साकोरे येथील शेतकरी श्‍यामराव विठ्ठल आवटे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT