Ujani Dam
Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Ujani Dam : उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग बंद

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः उजनी धरणाच्या (Ujani Dam) वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाने (Rain Update) विश्रांती घेतल्याने उजनी धरणातून भीमा नदीत (Bheema River) सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग (Ujani Dam Water Discharge) शुक्रवारपासून (ता.२३) बंद करण्यात आला आहे. आता फक्त वीजनिर्मितीसाठी (Power Generation) १६०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे.

शिवाय पंढरपुरातील पूरस्थितीही आता निवळली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने पाऊस होत असल्याने अतिरिक्त पाणी उजनी धरणामध्ये सोडण्यात येत होते. तब्बल ६० हजार ते एक लाख क्युसेकपर्यंत हा विसर्ग वाढवण्यात आला होता. पण या पाण्यामुळे उजनी धरणातील साठ्यातही मोठी वाढ झाल्याने उजनीतूनही पुढे भीमा नदीत तेवढाच विसर्ग सोडण्यात येत होता.

त्या पाण्यामुळेच पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पण आता उजनीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे, पाणी पातळीतही घट झाली आहे. त्यामुळे सध्या दौंडकडून केवळ १४ हजार ४९९ क्युसेक इतकेच पाणी उजनी धरणामध्ये येत आहे. पण आता उजनी धरणातून पुढे भीमा नदीतील विसर्ग मात्र पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

मुख्य कालव्यासह वीजनिर्मितीला सोडले पाणी उजनी धरणामध्ये सध्या एकूण पाणी पातळी ४९७.८० मीटर एवढी आहे. एकूण पाणीसाठा १२०.२२ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ५६.५७ टीएमसी इतका आहे. तर या पाण्याची टक्केवारी १०५.६९ टक्के इतकी आहे.

पाण्याच्या वरून येणाऱ्या पुढे सोडलेल्या विसर्गात घट झालेली असली, तरी सध्या सीना-माढा कालव्याला २९६ क्युसेक, मुख्य कालव्याला १००० क्युसेक आणि वीजनिर्मितीसाठी १६०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT