Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Replantation : सिंधुदुर्गात ३ हजार हेक्टरवर भातरोप पुनर्लागवड पूर्ण

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात ५ हजार ६७८ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या असून आतापर्यंत ३ हजार ९११ हेक्टरवरील भातरोप पुनर्लागवडीचे काम पूर्ण झाले आहे. यावर्षी ६२ हजार ३१४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड होणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भातपीक उत्पादन घेतले जाते. यावर्षी मॉन्सून लांबला त्यामुळे खरीप हंगामदेखील लांबणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेवर ५ ते ७ टक्के भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या होत्या. भात रोपवाटिकांतील रोपे पुनर्लागवडीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

आतापर्यंत ३ हजार ९११ हेक्टरवरील भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात या खरीप हंगामात ५ हजार ६७८ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. मॉन्सूनपूर्व तयार केलेल्या रोपवाटिकांतील पुनर्लागवड आता पूर्णत्वाकडे आहे.

मात्र २३ जूननंतर ५० टक्क्यांहून अधिक भातरोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. यातील रोपे लागवडी योग्य होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर पंधरा ते वीस दिवस लागवडीला लागतील, असा अंदाज आहे.

जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. यावर्षी ६२ हजार ३१४ हेक्टर क्षेत्र भातपीक लागवडीखाली येणार आहे. आतापर्यंत ३ हजार ९११ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे.
- अरुण नातु, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी विभाग, सिंधुदुर्ग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांत

Budget Update : अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय : अजित पवार

Watershed Mismanagement Case : पाणलोट गैरव्यवहारप्रकरणी फौजदारी कारवाई करा

Vegetable Market : गोव्यातील विक्री केंद्रे खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला, फळे

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

SCROLL FOR NEXT