Agriculture Pollution Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Pollution : कंपन्यांचे सांडपाणी शेतात

Agriculture Pollution : पालसई गावातील टायर कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी शेतीत जात असल्याने भात पिकाचे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Wada News : पालसई गावातील टायर कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी शेतीत जात असल्याने भात पिकाचे नुकसान होत आहे. येथील सुमारे दहा एकर शेतात रासायनिक सांडपाण्याचे तवंग असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या कंपन्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

वाडा तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने अनेक कंपन्या येथे स्थिरावल्या आहेत. तालुक्यातील पालसई गावाच्या परिसरात अनेक टायरच्या कंपन्या आहेत. जुन्या वाहनांचे टायर तोडून त्यातून राख, ऑईल व तार काढून त्याचा उपयोग अन्य कामासांठी केला जातो. हे सर्व करत असताना या कंपन्यांतून प्रदूषण होते.

कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी भातशेतीत जात असल्याने नव्याने केलेली लावणी करपून जात आहे, तर शेतात रासायनिक सांडपाणी गेल्याने त्याचे तवंग दिसून येत आहेत. या कंपन्यांच्या जलप्रदूषणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांनी अलीकडेच तक्रार दाखल करून या कंपन्या बंद करून भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

कूपनलिकेचे पाणीही प्रदूषित

भातशेतीबरोबरच येथील कूपनलिकेचे पाणीही प्रदूषित झाल्याचा दावा या शेतकऱ्यांनी तक्रारीत केला आहे. ग्रामपंचायतीनेही ३१ मे २३ रोजी झालेल्या ग्रामसभेत, प्रदूषण करणाऱ्या काही कंपन्या बंद करण्याचा ठराव घेण्यात आला होता.

अनेक शेतकऱ्यांचे नुकसान

रवींद्र पांडुरंग पाटील

अमृत तुकाराम पाटील

मोहन गोविंद पाटील

सुधाकर शंकर पाटील

पुंडलिक विठ्ठल पाटील

प्रभाकर विनायक पाटील

गोविंद रामचंद्र पाटील

सुरेश रामचंद्र पाटील

प्रभाकर पद्मण पाटील

प्रभाकर विनायक पाटील

आदी शेतकऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भातशेतीचे नुकसान होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन डोळेझाक करत आहे. आता झालेल्या नुकसानीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा गावकऱ्यांनी निर्धार केला आहे.
- रवींद्र पाटील, शेतकरी
कंपनीतील सांडपाण्यामुळे नुकसान झालेल्या रवींद्र पांडुरंग पाटील यांना ४० हजार, तर अमृत तुकाराम पाटील यांना २० हजार रुपयांच्या नुकसानीचे धनादेश देण्यात आले आहेत.
- दीपेश पाटील, व्यवस्थापक, स्पेशालिटी स्टील सप्लायर्स
पालसई गावातील शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने चौकशीसाठी हे प्रकरण प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवले आहे. अहवाल येताच त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- सुनील लहांगे, नायब तहसीलदार, वाडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Power Supply Disconnection: ३४ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Labour Migration: मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी सोयगावात १२० कामे मंजूर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी मिळेल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

E Crop Survey: आता ऑफलाइन करता येणार ‘ई-पीकपाहणी’: उज्ज्वला पांगरकर

E Crop Survey: ई-पीक पाहणी न झालेल्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT