रत्नागिरी ः रत्नागिरीसह कोकणातील सर्व कृषी, शेतीपंपांची (Agriculture Pump) वर्गवारी अॅग्रीकल्चर अदरमध्ये करण्यात आल्यामुळे आंबा (Mango), काजू, नारळ, पोफळीच्या बागांना पाणी देण्यासाठी घेतलेल्या शेतीपंपांची बिले (Electricity Bill) अव्वाच्या सव्वा येत आहेत.
हा निकष महावितरणकडून फक्त रत्नागिरी जिल्ह्यालाच लागू केला आहे. अन्य जिल्ह्यांत तशी बिले काढली जात नाहीत. वीजबिलांमुळे शॉक बसलेल्या आंबा बागायतदारांनी महावितरणविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्धार केला असून आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे.
रत्नागिरीतील काही आंबा-काजू बागायतदारांचे वीजबिल चौपट आले आहे. याबाबत प्रा. नाना शिंदे, सुभाष पोतकर, अॅड. ज्ञानेश पोतकर यांच्यासह काही बागायतदारांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयात आमदार शेखर निकम यांची भेट घेतली आणि भविष्यातील आंदोलनावर चर्चा केली.
प्रत्येक तालुक्यातील बागायतदारांना एकत्रित करून भविष्यात महावितरणच्या निर्णयाविरोधात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार निकम यांनी जाहीर केले आहे. कोकणात साधारण ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडतो, तिथपर्यंत सर्व पिकांना, फळबागा, नर्सरी-रोपवाटिका आदींना सिंचनासाठी पाणी लागत नाही. ऑक्टोबर हिटपासून ते जूनच्या मध्यापर्यंत सिंचनाची गरज भासते.
अॅग्रीकल्चर अदर अशी नवीन वर्गवारी करून त्याद्वारे या कृषिपंपाना प्रचंड बिले येतात. विशेष म्हणजे हे टेरिफ फक्त आणि फक्त कोकणातील शेतकऱ्यांनाच लागू केले आहे. उर्वरित राज्यात कृषी अशीच नोंद केली जाते. हा अन्याय फक्त कोकणावरच केला जात असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.