Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : कोल्हापुरात शेतकरी हतबल

परतीचा पाऊस जिल्ह्यात अद्याप सुरूच आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या भागात पाऊस सुरू असल्याने नुकसान वाढत आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : परतीचा पाऊस (Heavy rainfall) जिल्ह्यात अद्याप सुरूच आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या भागात पाऊस सुरू असल्याने नुकसान वाढत आहे. रोजच्या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. पावसाने जिल्ह्यात गेले आठ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. शेतातील सोयाबीन मळणीची (Soybean Threshing)कामे ठप्प झाली होती.

पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने सोयाबीन कापणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मजुरांची कमतरता असल्याने खंडित काम घेण्यावर मजुरांचा कल वाढला आहे.

पावसाने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून शेतकरी जादा पैसे देऊन पीक काढणी करून घेत आहेत. मजुरांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा फायदा घेत मजुरीचे दर वाढवले आहेत. सोयाबीन कापणी, मळणीसाठी एकरी पाच हजार रुपये दर आकारला जात आहे.

त्याचबरोबर शेतात चिखल असल्याने सर्व पीक बाहेर काढावे लागत असल्याने वाहतूक खर्च वेगळा घेतला जात आहे. तसेच मळणीसाठी मशिन मालक एका पोत्यासाठी चारशे ते पाचशे रुपये दर घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT