Ahilyanagar News: राज्यात लहान, मध्यम व मोठ्या धरणांत ५६.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ५०.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा धरणांमध्ये होता. यंदा गतवर्षीपेक्षा सुमारे सहा टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. अर्थात, यंदाच्या वर्षात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसात काही प्रमाणात खंड पडू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवीत आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे..राज्यात लहान, मध्यम व मोठी मिळून ३०११ धरणे आहेत. यंदा पावसाळ्यात ही धरणे लवकर भरली. शिवाय परतीचा पाऊसही जोरात झाल्याने पाणीसाठा मुबलक झाला होता. आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे..Water Storage: देशातील मोठी ४० टक्के धरणे निम्मी रिकामी, महाराष्ट्रात किती पाणीसाठा?.अद्याप उन्हाच्या तीव्रतेचे अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत. सध्याच्या पाणी उपलब्धतेचा विचार करता आजअखेर राज्यातील सर्व धरणांत ५६.७७ टक्के (७१९.२१६ टीएमसी, टीएमसी : थाऊजंड मिलियन क्युबिक फीट - हजार दशलक्ष क्युबिक फूट) उपयुक्त पाणी उपलब्ध आहे..जलसंपदा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी राज्यातील धरणांमध्ये ५०.०४ टक्के म्हणजेच ७१९.२२६ टीएमसी इतका पाणी साठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत सात टक्के पाणी अधिक शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभागात सर्वाधिक (५९.७३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे..Water Storage Decline: एका महिन्यात तब्बल १६ टक्क्यांनी घटला पाणीसाठा.उजनी धरणात २९ टीएमसी (५४.३९ टक्के), कोयना धरणात ५९.३४ टीएमसी (५९.२६ टक्के), तर जायकवाडी धरणात ४९.६८० टीएमसी (६४.८० टक्के) पाणी उपलब्ध आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात ७.५०५ टीएमसी (६७.९९ टक्के), निळवंडे धरणात ४.१५७ टीएमसी (४९.५६ टक्के) आजमितीस पाणीसाठा आहे..लहान, मध्यम व मोठी धरणेव उपलब्ध पाणीसाठा (कंसात आकड्यांतील टक्केवारी)कोकण विभाग १७३ धरणे, ७२.६०८ टीएमसी (५५.४९)नाशिक विभाग ५३८ धरणे, ११८.६५१ टीएमसी (५६.४४)पुणे विभाग ७२२ धरणे, २९३.४५० टीएमसी (५४.५२)छत्रपती संभाजीनगर विभाग ९२२ धरणे, १५३.३५९ टीएमसी (५९.७६)अमरावती विभाग २७१ धरणे, ८२.३२८ टीएमसी (६०.०१)नागपूर विभाग ३८५ धरणे, ९५.५४८ टीएमसी (५८.२०).सध्या उन्हाळी हंगाम सुरू आहे. उपलब्ध असलेला उपयुक्त पाणीसाठा लक्षात घेता उन्हाळ्यात शेती सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. यंदा पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील फारशी भेडसावणार नाही. मात्र उन्हाळ्याचा कालावधी, वाढत जाणारे तापमान आदी कारणांमुळे बाष्पीभवन व्यय जास्त संभवतो व त्यामुळे पिण्याचे पाणी पुरविण्याच्या दृष्टीने देखील नियोजन आवश्यक आहे.हरिश्चंद्र चकोर, सेवानिवृत्त जलसंपदा अभियंता व पाणी अभ्यासक, संगमनेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.