Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : कंधार, लोहा तालुक्यांतील शेतकऱ्यांत संताप

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत शासकीय यंत्रणांनी नुकसानीसंबंधी नजरअंदाज अहवाल जिल्हा प्रशासनाला कळविला. यात कंधार व लोहा तालुक्यात नुकसान झाले नसल्याचा जावईशोध तालुकास्तरीय यंत्रणांनी लावला आहे.

पेरणीनंतर जुलै महिन्यात लोह्यात पाच वेळा, तर कंधारमध्ये एकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सोबतच सततचा पावसानेही कोवळी पिके नष्ट झाली आहेत. परिणामी, पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. यामुळे कंधार, लोह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस होऊन खरिपातील पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत जमीन खरडूनही शेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने शासकीय यंत्रणांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कृषी, महसूल व जिल्हा परिषदेच्या क्षेत्रीय यंत्रणांनी पंचनामे करून अहवाल कळविला.

यात जिल्ह्यात कंधार व लोहा तालुके वगळता इतर १४ तालुक्यांतील पाच लाख शेतकऱ्यांचे तब्बल साडेचार लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे कळविले आहे. परंतु यात कंधार व लोहा तालुक्यात मात्र नुकसान नसल्याचा जावईशोध घरी बसून अहवाल तयार करणाऱ्या यंत्रणांनी लावला आहे.

दरम्यान अतिवृष्टीच्या अहवालातून कंधार व लोहा तालुक्यांना वगळल्याचे वृत्त गुरुवारी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित होताच या तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.

लोहा तालुक्यात सहा वेळा अतिवृष्टी

लोहा तालुक्यातील माळाकोळी मंडलात सहा जुले रोजी ७१ मिलिमीटर व १९ जुले रोजी ७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच शेवडी मंडलात १९ जुले रोजी ८२ मिलिमीटर, सोनखेड मंडलात १९ जुलैला ८० मिलिमीटर व २८ जुलैला ७४ मिलिमीटर, २८ जुले रोजी कापसी मंडलात ७१.७५ मिलिमीटर व कलंबर मंडलात ६७.२५ मिलिमीटर पाऊस झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

तर कंधार तालुक्यातील उस्माननगर मंडळात २७ जुले रोजी ७१.७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यासोबतच जुलैमध्ये सततचा पाऊसही शेतकऱ्यांचा पाठ सोडायला तयार नव्हता. यामुळे नुकतीच अंकुरलेली कोवळी पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली असताना कंधार व लोहा तालुक्यात पाऊसच झाला नाही असा जावईशोध तालुकास्तरीय यंत्रणांनी लावल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कंधार-लोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या. सततच्या पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोणताही कर्मचारी बांधावर न येता, केवळ पाऊस झाला नाही, असा जावईशोध लावत आहेत, याबाबत प्रशासनाला जाब विचारू, प्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढू.
- किरण गव्हाने, महानगराध्यक्ष, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT