Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : ‘प्रहार’च्या आंदोलनानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू

Mahatransco News: महापारेषणने शेतकऱ्यांना ठेवले २०१८ पासून वंचित

Team Agrowon

Crop Damage News : वीज वाहिनीच्या तारा व विजेच्या खांबासाठी झालेल्या पीक नुकसान भरपाईस २०१८ पासून विलंब केल्याने प्रहार संघटनेने अर्धनग्न आंदोलन करताच नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करण्यास सुरवात करण्यात आली आहे.

तालुक्यातील भाळवणी, खोमनाळ, फटेवाडी भागातून जाणारी पंढरपूर- मंगळवेढा निंबोणी उपकेंद्र वाहिनीवरील १३२ केव्ही उपकेंद्रासाठी टाकलेल्या विद्युत वाहिनीचा टॉवर व त्या टॉवरच्या तारेखालील झाडाची नुकसान भरपाई २०१८ पासून देण्यास महापारेषण कंपनीने टाळाटाळ केल्याने अखेर प्रहार संघटनेने प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी अर्धनग्न आंदोलन केले.

त्यानंतर प्रभारी प्रांताधिकारी संतोष देशमुख यांच्या मध्यस्थीने आंदोलन थांबविण्यात आले. महापारेषण कंपनीकडून २०१३ पासून उभारण्यात आलेला विजेचा टॉवर व त्याखालील नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. सधन लोकांना नुकसान भरपाई दिली, पण गरीब शेतकऱ्यांना त्या मोबदल्यापासून वंचित ठेवले.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवरचे काम चालू असताना पोलिस बंदोबस्त लावून या अधिकाऱ्यांनी काम करून घेतले, मात्र मोबदल्यासाठी अडवणूक केल्यावर शेतकऱ्यांना काम संपताच मोबदला देऊ, असे सांगितले होते.

ते शेतकरी २०१८ पासून आजपर्यंत मोबदल्यासाठी धडपडत आहेत. २०१८ मध्ये पंचनामे झाले तेव्हापासून आजतागायत शेतकरी वंचित राहिला.

१० मे रोजी महापारेषण अधिकाऱ्यांनी शेतकरी व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याची भूमिका घेतल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables : आरोग्यदायी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील

Agriculture Department : कृषी विभाग रोज पन्नास हजार शेतकऱ्यांच्या संपर्कात

Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल

Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?

SCROLL FOR NEXT