Kharif Season 2023 Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season 2023 : अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करा; पावत्या, टॅग जपून ठेवा

Kharif Crop Seed : राज्यात १ जून ते १० जुलै या कालावधीचे सरासरी पाऊस ३१४.३ मिलिमीटर होतो. परंतु यंदा प्रत्यक्षात २२७.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो आतापर्यंतच्या सरासरीच्या ७२ टक्के इतका आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात खरिपाच्या पेरण्या आता ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. राज्यात बियाण्यांचा साठा भरपूर असून, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावी. बियाण्यांची पावती व टॅग जपून ठेवावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

राज्यात १ जून ते १० जुलै या कालावधीचे सरासरी पाऊस ३१४.३ मिलिमीटर होतो. परंतु यंदा प्रत्यक्षात २२७.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो आतापर्यंतच्या सरासरीच्या ७२ टक्के इतका आहे.

राज्याचे खरिपाचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. १० जुलैपर्यंत प्रत्यक्षात ४७.१३ लाख हेक्टरवर म्हणजेच ३३ टक्के पेरा झालेला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल. सद्यःस्थितीत पेरणीची कामे संथ गतीने सुरू आहेत. कापूस, सोयाबीन, तुरीच्या पेरण्या सुरू आहेत. तसेच भात रोपवाटिकेची कामे अजूनही चालू आहेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कृषिविषयक योजनांची माहिती हवी असल्यास किंवा तक्रार असल्यास १८००२३३४००० या हेल्पलाइन नंबरचा वापर करता येईल. खरीप हंगामात राज्याला १९.२१ लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता असते. त्यातुलनेत सद्यःस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

त्यापैकी आतापर्यंत १६,८२,२४५ क्विंटल म्हणजेच ८७ टक्के बियाणे पुरवठा झालेला आहे. बियाणे साठा उपलब्ध आहे. मात्र शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडून घेतलेली पावती व टॅग जपून ठेवणे आवश्यक आहे.

दरम्यान, राज्यात खताचाही भरपूर साठा असल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. राज्याला ४३.१३ लाख टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर झालेले आहे. त्यापैकी आतापर्यंत ४६.०७ लाख टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे.

उपलब्ध साठ्यातून शेतकऱ्यांना १८.९५ लाख टन खतांची विक्री करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत राज्यात २७.१२ लाख टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी, असे गुणनियंत्रण विभागाचे म्हणणे आहे.

पीकविम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत

पंतप्रधान पीकविमा योजनेच्या चालू खरीप हंगामात सहभागी होण्‍यासाठी शेतकऱ्यांकरिता अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे. जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज भरून योजनेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन कृषी आयुक्‍त सुनील चव्‍हाण यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT