Government Jobs: योजनांत घट, रिक्त पदे आणि सुधारित आकृतिबंधात दुय्यम स्थान यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या कृषी विभागांची स्थिती नाजूक झाली आहे. केवळ २५० ते ३०० अधिकाऱ्यांनिशी येथील कामाचा डोलारा सांभाळावा लागत आहे, असा आरोप करत अधिकाऱ्यांच्या संघटनांनी सरकारकडे याबाबत नाराजी व्यक्त केली..या संघटनांच्या म्हणण्यानुसार, कधीकाळी १०० हून अधिक योजनांची अंमलबजावणी करणारा हा विभाग आता फक्त तीन योजनांवर चालू आहे. त्यातही अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने तारेवरची कसरत सुरू आहे..ZP Agriculture Department: मंत्रिस्तरावर बैठका-चर्चा, पण पदरी केवळ आश्वासने.एकीकडे सुधारित आकृतिबंधात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला सापत्न वागणूक दिली जात असताना राज्याच्या कृषी विभागात मात्र हजारो कर्मचारीकार्यरत आहेत. .धोरणात्मक निर्णय, निधी वाटप आणि योजना अंमलबजावणी यामध्ये राज्याच्या विभागाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे दुय्यम नजरेने पाहिले जात आहे. यातूनच हा कृषी विभाग बंद करण्याच्या हालचालीदेखील सुरू आहेत..Pulses Processing Subsidy: कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी २५ लाखांचे अनुदान.राज्याच्या कृषी विभागात ३९,५१७ मंजूर पदांपैकी ३०,५६४ पदे भरलेली असून, ८,९५३ पदे रिक्त आहेत. कृषी सहायक, सेवक आणि तांत्रिक पदांचा यात समावेश आहे..राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. हा विभाग बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- राहुल घरडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस (अनुसूचित जाती विभाग).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.