
Yavatmal News : शेतकरी आत्महत्याप्रवण अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. मात्र या आत्महत्या नियंत्रणाकरिता शासनस्तरावरून कोणतेच प्रयत्न होत नसून गेल्या वर्षभरापासून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचे पदही भरण्यात आले नाही. हे पद तत्काळ न भरल्यास एसएओ कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना याबाबत निवेदन पाठविले आहे. त्या निवेदनानुसार, यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. त्याची दखल घेत या जिल्ह्यात कृषी व संलग्न योजनांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. परंतु शासनस्तरावर त्यादृष्टीने कोणतेच पूरक प्रयत्न होताना दिसत नाही.
याउलट गेल्या वर्षभरापासून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या कृषी विभागाला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांची पदोन्नतीवर अमरावती विभागीय कृषी सहसंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
तेव्हापासून यवतमाळ ‘एसएओ’ पद रिक्त असून त्याचा प्रभार आत्मा प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परिणामी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना देण्यात आल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.