Farmer Compensation Delay: यवतमाळ जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवूनही नुकसानभरपाईची प्रतीक्षा कायम आहे. विमा कंपन्यांकडून अंतिम अहवाल आणि निकष जाहीर करण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे..मिळालेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ५७३ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. यासाठी शेतकऱ्यांनी २५७ कोटी रुपयांचा प्रीमियम भरला. त्यात राज्य व केंद्र सरकारने मिळून १ हजार ३६५ कोटी रुपयांचा हिस्सा उचलला. एकूण मिळून १ हजार ६२३ कोटी १९ हजार रुपयांचे पीक विमा संरक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. .Crop Insurance Delay: स्थगिती नसताना शेतकऱ्यांच्या हक्काचा पीकविमा का अडवला?.जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यंदा हवामानातील बदल आणि विविध नैसर्गिक कारणांमुळे अनेक भागांत उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या अपेक्षेने विमा योजनेत सहभाग घेतला होता..Insurance Claim Rejection: भरपाई नाकारणे विमा कंपनीला पडले महागात.पीक कापणी प्रयोगांच्या आधारे नुकसानाचे प्रमाण निश्चित करून भरपाई देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि त्यानुसार मिळणाऱ्या भरपाईबाबत स्पष्टता नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत..सुधारित आदेशांनंतरही गोंधळ कायमदरम्यान, पूर्वी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांत माहिती दिल्यास मदत मिळण्याची तरतूद होती. आता त्याबाबतही सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात किती मदत मिळणार, कोणत्या निकषांवर मिळणार याबाबत माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.