Nagpur News ः महिलांचा शेतीक्षेत्रात सर्वाधिक राबता असला तरी त्यांना निर्णय प्रक्रियेत अपेक्षित स्थान मिळत नाही.
कुटुंब म्हणून शेतीमध्ये पीक निवड आणि व्यवस्थापनात (Crop Selection and Management) महिलांनाही सहभागी करून घेतल्यास निश्चितच शेतीचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही, असे मत शेतीक्षेत्रात कार्यरत महिलांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने शेतीक्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
सकाळ कार्यालयात बुधवारी (ता.८) पार पडलेल्या या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच रामेती प्राचार्य डॉ.अर्चना कडू, कोहळी येथील प्रयोगशील शेतकरी आरती पदमवार, आनंद मळा कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका भावना हस्तक यांची उपस्थिती होती.
‘सकाळ’च्या वतीने विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, मुख्य वितरण व्यवस्थापक विजय वरफडे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अर्चना कडू यांनी ग्रामीण भागात आजही शेती क्षेत्रात महिलांचे अधिक वेळ शेतीत राबतात.
परंतु निर्णय प्रक्रियेत मात्र त्यांचा सहभाग फार कमी किंवा शून्य असतो. पीक निवड, कीड व्यवस्थापन इतकेच काय तर कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेती विषयक कार्यशाळांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे.
आरती पदमवार (वानखेडे) यांची कोहळी शिवारात शेती आहे. शेतीची आवड असल्याने आठवड्यातील तीन दिवस शेतीला देत असल्याचे त्यांनी सांगितले. भावना हस्तक यांनी नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली.
त्यानंतर शेतीची आवड असल्याने त्यांनी जामठा नजीक आनंद मळा नावाने कृषी पर्यटन फुलविले. त्याविषयीचा अनुभव कथन त्यांनी केला.सूत्रसंचालन ॲग्रोवनचे सुनील धांडे यांनी केले, तर प्रास्ताविक ॲग्रोवन बातमीदार विनोद इंगोले यांनी केले.
या वेळी अमोघ हस्तक, अजय आत्ते, ॲग्रोवनच्या वितरण शाखेचे सहव्यवस्थापक शशांक पावडे या वेळी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.