Maharashtra Farmer Loan Waiver : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून देण्यात येणारा वार्षिक ६ हजार रुपयांचा हप्ता बंद करण्यात येईल, या चर्चेने जोर धरला आहे. कर्जमाफीचा आधार घेत नमो शेतकरी महासन्मान निधीला कात्री लावली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वड्डेटीवार यांनी सोशल मिडीया पोस्टमध्ये शुक्रवारी (ता.१) आरोप केला. त्यामुळे या चर्चेचा वारू चौखूर उधळल्याने शेतकऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे..२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पीएम किसानच्या धर्तीवर जून २०२३ पासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना चार महिन्यांनी २ हजार रुपये म्हणजेच वार्षिक ६ हजार रुपये वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये राज्यातील साधारण ९० लाख शेतकरी पात्र आहेत..राज्य सरकारने मात्र नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतून ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीवर ४० हजार कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आर्थिक भाराचं कारण देत या योजनेतूनकर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या ५६ लाख शेतकऱ्यांना वगळले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे..राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आत्तापर्यंत आठ हप्त्यांमध्ये १४ हजार ८१६ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मार्च २०२६ मध्ये २०२५ च्या ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यानचा हप्ता वितरीत करण्यात आला. परंतु डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै अनुक्रमे नववा आणि दहावा हप्ता अद्यापही प्रलंबित आहे..Namo Shetkari MahaSamman Yojana : ‘मुख्यमंत्री शेतकरी सन्मान’ निधीपासून ३० टक्के शेतकरी वंचित.कृषी आयुक्तालयाने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. परंतु राज्य सरकारने निधीसाठी मंजूर दिली नाही. त्यामुळे नमोचे दोन्ही हप्ते अडकले आहेत. त्यामुळे एका हाताने कर्जमाफी देऊन दुसऱ्या हाताने नमो शेतकरी योजना काढून घेतली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. .राज्य सरकारने मात्र याबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नमो शेतकरीचा हप्ता बंद होणार का, या पार्श्वभूमीवर अॅग्रोवनने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.."कर्जमाफीच्या नावाखाली एका हाताने दिल्याचा गाजावाजा आणि दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांचा हक्काचा निधी काढून घेण्याचा हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची सरळ फसवणूक आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, कर्जमुक्ती योजनेच्या प्रसिद्धीसाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च केला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचत नाहीत, पण जाहिरातींवर मात्र कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते. शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय करण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा रंगवण्यातच सरकार अधिक व्यस्त आहे."- विजय वड्डेटीवार, आमदार, काँग्रेस.Namo Shetkari Scheme:‘नमो शेतकरी’ योजनेतून ९७.५२ कोटी रुपये जमा.नमो शेतकरीचा लाभनमो शेतकरी योजनेतून २०२३-२४ या वर्षात ८२ लाख ८२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ३०४ कोटी रुपये वितरीत करण्यात आले. तर २०२४-२५ मध्ये ९३ लाख शेतकऱ्यांना ५ हजार ८२५ कोटी रुपये हजार वितरीत करण्यात आले. तसेच लाख शेतकऱ्यांना ३ हजार ६८५ कोटी रुपये वितरीत करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.