Crop Damage : पांढऱ्या कांद्यासह तोंडलीही अडचणीत

Unseasonal Rain : मॉन्सूनोत्तर पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे आंबा पिकासह तोंडली, व पांढरा कांद्याच्या उत्‍पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Alibaug News : मॉन्सूनोत्तर पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे आंबा पिकासह तोंडली, व पांढरा कांद्याच्या उत्‍पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. असेच वातावरण राहिल्‍यास कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये आंब्याचे १४ हजार हेक्टर क्षेत्र पीक असून १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड होते. वीस हजारांहून अधिक शेतकरी आंब्याची लागवड करत आहेत.

Crop Damage
Crop Damage : पावसाने २० हजार एकर द्राक्ष बागांचे नुकसान

अलिबाग तालुक्यात तोंडलीचे क्षेत्र २३२.८० हेक्टर आहे. सुमारे ८५५ शेतकरी तोंडलीचे उत्पादन घेतात. भात कापणीची कामे संपल्यावर तोंडलीची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. जाडी व कळी तोंडली अशा दोन प्रकारांमध्ये तोंडली बाजारात वेगवेगळ्या भावामध्ये विकली जाते. हळदी समारंभासह घरगुती जेवणात, हॉटेल व्यावसायिकांकडून तोंडलीला प्रचंड मागणी आहे. याशिवाय औषध गुणधर्म असलेल्‍या अलिबागचा पांढऱ्या कांद्यालाही ग्राहकांकडून मागणी आहे.

अलिबागमधील पांढरा कांदा आकाराने मध्यम असून चवीला गोड असतो. तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. कार्ले परिसरात प्रत्येक घरांतील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात.

Crop Damage
Unseasonal Rain : द्राक्ष, डाळिंब बागायतदार चिंतेत; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

रोहा तालुक्यातील खांब व देवकान्हे या गावांमध्येही काही प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. या कांद्यापासून सुमारे एकरी सहा टन तर हेक्टरी १५ टन उत्पादन मिळते. यातून सुमारे तीन कोटींची उलाढाल होते. कांदा लागवडीपासून दीड

हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्‍याने काही ठिकाणी आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र दोन दिवसांपासून अचानक वातावरणात बदलले आहे. कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहोर गळण्याची शक्‍यता आहे. तर बियाण्यांसाठी लागवड केलेल्या कांद्याला पावसाचे पाणी घातक आहे.

उगवणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. कांद्याला बुरशी लागण्याची भीती आहे. आंब्याच्या मोहोरावर परिणाम होऊन तुडतुड्या व अन्य कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पिकांवर त्याचा परिणाम होऊन वेगवेगळ्या रोगांचा धोका होऊ शकतो, असे शेतकरी प्रभाकर नाईक यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com