Farmers Protest : शेतकरी संघटनांचा सरकारविरोधात एल्गार; ९ ऑगस्टला ट्रॅक्टर मोर्चा

Delhi Farmer Protest : हरियाणाच्या शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारला असून ९ ऑगस्टला शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. 
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : १३ फेब्रुवारी २०२४ पासून हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर शेतकरी हमीभावाच्या कायद्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. यादरम्यान दिल्ली-हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता 'दिल्ली चलो'चा मार्ग मोकळा झाला आहे. तर २२ तारखेला दिल्लीत शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. मात्र हरियाणा सरकराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. यावरून शेतकरी नेते आक्रमक झाले असून ९ ऑगस्टला ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा करताना आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत यांनी बुधवारी (ता.१७) दिली. उत्तर प्रदेशामधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिसौली येथील किसान भवनात बीकेयूची मासिक पंचायत पार पडली. यानंतर नरेश टिकैत बोलत होते. 

यावेळी टिकैत म्हणाले, स्थानिक शेतकरी, अधिकारी आणि विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सिसौली येथील किसान भवनात मासिक पंचायत पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. तसेच आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांचा आवाज बळकट करण्यासाठी गावपातळीवर मोर्चे बांधणी करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आल्याचे टिकैत म्हणाले. 

Farmers Protest
Farmers Protest : शेतकरी आंदोलनाबाबत राजधानीत दिल्लीत २२ जुलैला बैठक

तसेच सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आमचा मार्ग रोखला. त्यामुळे ९ ऑगस्टला राज्यभरात ट्रॅक्टर मोर्चा काढले जातील. तसेच राज्यात दोन महापंचायतींचे आयोजन करण्यात आले असून येथे मोठ्या संख्येने शेतकरी नेते एकत्र येतील, असेही टिकैत म्हणाले.

Farmers Protest
Farmers Protest : शेतीमालासह दूधदरासाठी पुण्यात ९ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन

पुढे टिकैत म्हणाले, हमीभावासह इतर मागण्यांसाठी सतत आम्ही आवाज उठवत आहोत. मात्र मागण्या मान्य न करता सरकार आमची फसवनूक करत आहे. सर्व मागण्यांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा टिकैत यांनी दिला आहे. तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी मजबूत संघटनात्मकआ बांधणी गरजेची असून संघटनेचा पाया गावांमधून मजबूत व्हायला हवा, असे आवाहन टिकैत यांनी केले.

दोन महापंचायत

टिकैत यांनी आगामी आंदोलनाची रनणीती आखण्यासाठी २० रोजी सहारनपूर आणि २२ जुलै रोजी अलिगड येथे किसान मजदूर महापंचायत भरवण्यात येणार असल्याची घोषणा केली. याशिवाय ट्रॅक्टर मोर्चातून शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारवर दबाव वाढवला जाईल. तर याचदरम्यान स्थानिक समस्या देखील सोडविण्यासाठी प्रशासनास निवेदन दिले जाईल असे टिकैत यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com