
Chh. Sambhajinagar News : विहिरीच्या दीड वर्षांपासून काम बंद पडल्याने व केलेल्या कामाची बिले निघत नसल्याने संतप्त झालेल्या विहिरीच्यालाभ धारक शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ६) सकाळी १० वाजेच्या सुमारास येथील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन केले. बिडिओंच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शासनाने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी पारुंडी तांडा (ता. पैठण) येथील २७ शेतकऱ्यांच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या कामाच्या प्रस्तावाला मंजूर देऊन पैठण पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यामार्फत त्याचे जिओ टँगिंग केले.
यानंतर विहिरींचे काम सुरु होताच येथील एका माजी सरपंचासह विरोधातील तीन ग्राम पंचायत सदस्यांनी पंचायत समिती कार्यालय पैठण येथे सदरील विहिरींचे काम बोगस होत असल्याची तक्रार दाखल केल्याने हे चालु झालेले काम गेल्या दीड वर्षांपासून रखडल्याचा आरोप आहे.
याबाबतीत लाभधारक शेतकऱ्यांसह ग्राम पंचायत प्रशासनाने वेळोवेळी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना या कामाची चौकशी करून हे काम पुर्ववत सुरु करावे असे लेखी निवेदने दिले. मात्र पंचायत समिती कार्यालयांकडून कामाबाबत आक्षेप अर्ज आल्याने विहिरींचे काम करता येणार नाही, असे सांगून टाळाटाळ कऱण्यात आली.
त्यामुळे वैतागलेल्या येथील सर्व २७ लाभार्थ्यांसह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी गुरुवारी पाझर तलावात जलसमाधी आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पाण्याच्या बाहेर निघणार नाही असा पविञा घेतल्याने प्रशासनाची धांदल उडाली.
यानंतर गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, मंडलाधिकारी वैशाली कांबळे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, घटनास्थळी धाव घेवुन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.