
Jalgaon News : खानदेशात टरबूज किंवा कलिंगड लागवडीत सतत वाढ होत आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत उत्पादन खर्च अधिक असलेल्या पिकात एकरी लाखाचे उत्पन्न घेत शेतकरी या पिकाकडे वळले. परंतु यंदा उत्पादन कमी व खर्च अधिक अशी स्थिती आहे. दरही अस्थिर आहेत.
काही शेतकऱ्यांनी यंदा एका एकरात हे पीक घेऊन नशीब आजमावण्याचा प्रयोग केला त्यातून त्यांना एकरी 50 ते 60 हजार रुपयांचेच उत्पन्न हाती आले आहे. मागील वेळेस हा नफा अधिक होता. कलिंगड पीक कमी दिवसात येणारे आहे.
पण हे जोखमीचे पीक असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. साधारणपणे रमझान महिन्यात टरबूज निघत असल्यास भाव चांगला मिळून उत्पन्न अधिक येते, असे अनुभव असल्याचे शेतकरी सांगतात.
पण यंदा रमझान महिन्यातच टरबूज दर कमी आहेत. कलिंगड किंवा टरबूज दोन किलोपेक्षा अधिक वजनाचे राहिल्यास त्यास अधिक दर मिळत आहे. दोन किलोपेक्षा कमी वजनाच्या कलिंगडास कमी दर आहेत. त्यास ४ ते पाच रुपयांचे दर मिळतात.
लागवड वाढली
खानदेशात डिसेंबर, जानेवारीत टरबूज लागवड कमी होती. परंतु फेब्रुवारीत अनेकांनी लागवड केली आहे. उष्णतेच्या काळात उठाव अधिक असतो व दरही चांगले मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु यात लागवड वाढली आहे.
सध्या टरबूजास आठ ते नऊ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर आहे. कमी दर्जाच्या टरबुजास फारशी मागणी नाही. त्यात होळी, धुलिवंदनाचा सण समोर आल्याने मजूरटंचाई व वाहतुकीचे काम रखडत सुरू आहे. उत्तरेकडे बाजार बंद असल्याने कलिंगड दर कमी झाल्याची स्थिती मागील दोन दिवसात तयार झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.