Water Storage : लघू, मध्यम प्रकल्पांत पाणीसाठा १६ टक्क्यांवर

Water Crisis : मराठवाड्यातील मध्यम ७५ व ७४९ लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा केवळ १६ टक्के उरला आहे.
Water Storage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील मध्यम ७५ व ७४९ लघू प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा केवळ १६ टक्के उरला आहे. एकूण ८७७ पाणीसाठ्यांमधील पाणीसाठा २८ टक्क्यांवर आला आहे. तळाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पाणीसाठ्यांची स्थिती मराठवाड्याची चिंता वाढविते आहे.

यंदा मराठवाड्यात पावसाळ्यात पाऊस अपेक्षित पडलाच नाही. वेळ चुकून पडलेल्या अवेळी पावसाने खरीपानंतर रब्बीचे क्षेत्र वाढविण्यास मदत केली, मात्र रब्बीच्या पिकांसह टंचाईचे आजचे मरण उद्यावर लोटले. आता झपाट्याने घटणारे पाणीसाठे मराठवाड्यातील पुढील तीन-चार महिन्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक असेल याची जाणीव करून देत आहेत.

Water Storage
Water Storage : कुकडी प्रकल्पात ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

२३ फेब्रुवारीअखेर मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. दुसरीकडे मध्यम ७५ व लघू ७४९ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा १६ टक्क्यांवर आला होता. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ४१ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना या ३ नद्यांवरील २७ बंधाऱ्यांमध्ये २५ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक उरले आहे.

तब्बल २५१ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये सर्वाधिक ९० लघू प्रकल्प धाराशिवमधील असून, त्यापाठोपाठ बीडमधील ५४, लातूरमधील ५०, छत्रपती संभाजी नगरमधील २७, जालन्यातील १३, परभणीतील १४, नांदेडमधील दोन व हिंगोली जिल्ह्यातील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे.

७५ माध्यम प्रकल्पांपैकी २४ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये धाराशिवमधील ९, बीडमधील ६, जालना व लातूर मधील प्रत्येकी ३, तर छत्रपती संभाजीनगरमधील दोन व नांदेडमधील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

Water Storage
Water Storage : सांगलीतील वीस प्रकल्प कोरडे

८७ प्रकल्प कोरडे

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पांपैकी जालना, बीड व धाराशिवमधील प्रत्येकी एक तर ७५० लघू प्रकल्पांपैकी ८४ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ९, बीडमधील २३, धाराशिवमधील ४३ प्रकल्पांचा समावेश आहे.

जालना, धाराशिवमध्ये स्थिती बिकट

जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात केवळ ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे याच जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पांमध्ये केवळ दोन टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. धाराशिव जिल्ह्यातील २०६ लघू प्रकल्पात ११ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून १७ मध्यम प्रकल्पात केवळ ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील पाणीसाठा यांची स्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बिकट आहे.

जिल्हानिहाय मध्यम प्रकल्प व उपायुक्त पाणीसाठा टक्का

जिल्हा प्रकल्प उपयुक्त पाणी टक्का

छत्रपती

संभाजीनगर १६ १४

जालना ०७ ०८

बीड १६ २५

लातूर ०८ १२

धाराशिव १७ ०६

नांदेड ०९ ३८

परभणी ०२ ०७

एकूण ७५ १७

जिल्हानिहाय लघू प्रकल्प व उपायुक्त पाणीसाठा टक्का

जिल्हा प्रकल्प उपयुक्त पाणी टक्का

छ.संभाजीनगर ९८ १६

जालना ५७ ०२

बीड १२६ १४

लातूर १३४ १५

धाराशिव २०६ ११

नांदेड ८० ५०

परभणी २२ ०८

हिंगोली २७ ३४

एकूण ७५० १७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com