Water Crisis
Water CrisisAgrowon

Water Scarcity : खानदेशात जलसाठा घटू लागला

Water Shortage : खानदेशातील जलसाठा आजघडीला एकूण ४० टक्क्यांपर्यंत आहे. जलसाठा या महिन्यातही झपाट्याने घटला आहे.
Published on

Jalgaon News : खानदेशातील जलसाठा आजघडीला एकूण ४० टक्क्यांपर्यंत आहे. जलसाठा या महिन्यातही झपाट्याने घटला आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणा, धुळ्यातील पांझरा, अनेर प्रकल्पातील जलसाठा यंदा लवकर कमी झाल्याची स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणात यंदा ५६ टक्केच जलसाठा होता. या धरणातून उद्योगांसाठी दोन वेळेस पाणी देण्यात आले आहे. तसेच नदीत दोन वेळेस टंचाई निवारणार्थ आवर्तन सोडण्यात आले आहे. पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, नाशिकमधील मनमाड या शहरांसह काही गावांच्या पाणी योजनादेखील गिरणा नदीवर अवलंबून आहेत.

Water Crisis
Water Crisis : पुणे जिल्ह्यातील सात धरणांत एक टक्क्यांपेक्षा कमी साठा

यामुळे या धरणातून रब्बीसाठी यंदा पाणी देण्यात आलेले नाही. धरणातील जलसाठा सुमारे ३९ टक्के एवढा आहे. या धरणाची साठवण क्षमता सुमारे १८ टीएमसी आहे. हे धरण खानदेशात सर्वांत मोठे असून, ते यंदा १०० टक्के न भरल्याने पाण्याची समस्या गिरणा पट्ट्यात दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेरातील वाघूर व तापी नदवरील भुसावळनजीकचे हतनूर हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते. दोन्ही प्रकल्पांची साठवण क्षमता नऊ टीएमसी एवढी आहे. या प्रकल्पांतूनही उद्योग, शहरांसाठी पाणी दिले जात आहे.

त्यांचा जलसाठाही घटला असून, वाघूरचा जलसाठा सुमारे ६० टक्के, तर हतनूरचा जलसाठा सुमारे ४५ टक्के एवढा आहे. वाघूरमधून जामनेर व जळगाव शहर, उद्योगासाठी पाणी देण्यात आले आहे. तसेच जळगाव, भुसावळातील रब्बीसाठीही दोन वेळेस आवर्तन सोडण्यात आले आहे. सुमारे पाच हजार हेक्टरवरील रब्बीला या धरणाचा लाभ होतो.

जळगाव जिल्ह्यात रावेरातील मंगरूळ, अभोडा, सुकी, यावलमधील मोर व गारबर्डी, जामनेरातील तोंडापूर, चोपड्यातील गूळ हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते. या प्रकल्पांतील जलसाठादेखील ५० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Water Crisis
Water Crisis : धरणांनी गाठला जानेवारीतच तळ

धुळ्यातील शिरपुरातील अनेर, साक्रीमधील पांझरा, तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज, हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. पांझरा प्रकल्पातून धुळे शहरास पाणीपुरवठा केला जातो. त्यातील जलसाठाही घटला आहे.

धुळ्यातील सोनवद, अमरावती, बुराई, मालनगाव हे प्रकल्प यंदा कमी पावसाने भरले नव्हते. यामुळे यातील जलसाठा अत्यल्प स्थितीत आहे. नंदुरबारातील दरा व देहली, ताप नदीवरील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते.

‘हतनूर’, ‘वाघूर’मधून सतत उपसा

हतनूर धरणातून भुसावळ शहर, भुसावळातील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव येथील आयुध निर्माणी व जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणात ५४ टक्के गाळ आहे. यामुळे जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. तसेच रावेर, यावल व चोपड्यातील रब्बी हंगामासाठी दोन वेळेस या धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com