
Rqatnagiri News : पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम १ ते ३० एप्रिल या कालावधीत राबवण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ७ हजार ७९० स्रोत आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. राज्यभर जलजीवन मिशन कार्यक्रम राबवण्यात येत असून, ग्रामीण भागातील कुटुंबांना घर घर नलसे जल याप्रमाणे प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट आहे.
ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी १ ते ३० एप्रिल व पावसाळ्यानंतर २ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ७७९० सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक स्रोतांची आकडेवारी
तालुका पाण्याचे स्रोत
मंडणगड ३९८
दापोल ८७५
खेड १००३
चिपळूण १२३९
गुहागर ७७६
संगमेश्वर ९७३
रत्नागिरी ७५६
लांजा ७१५
राजापूर १०५५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.