Sangli Drought Condition : सांगली जिल्ह्याचे दुष्काळात पाण्याचं नियोजन, पाण्याअभावी रब्बी हंगाम धोक्यात येण्याची भिती

Sangli Dam Condition : सांगली जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गतवर्षी याच कालावधीत ८८ टक्के होता.
Sangli Drought Condition
Sangli Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Rabi Season Sangli water Management : सांगली जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा गतवर्षी याच कालावधीत ८८ टक्के होता. सद्यस्थितीत कोयना धरणामध्ये ८९.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. टेंभू, ताकारी –म्हैसाळ योजना, नदीवरील सिंचन व बिगर सिंचन योजना याकरिता कोयना, वारणा धरण व इतर स्त्रोतातून एकूण उपलब्ध होणारे ४७.०५ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे.

दरम्यान सांगली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने बैठक घेत पुढील काळातील पाण्याचे नियोजन केले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या नियोजनानुसार, टेंभू योजनेचा नियोजित पाणी वापर ११.५५ टीएमसी आहे. यामध्ये कोयना धरण ८.९१ टीएमसी तर इतर स्त्रोतापासून २.६४ टीएमसी (वांग ०.९७ + तारळी १.६७ टीएमसी) तसेच ताकारी योजनेचा कोयना धरणातून ४.७० टीएमसी नियोजित पाणीवापर आहे.

म्हैसाळ योजना १२.८० टीएमसी नियोजित पाणीवापर आहे. यामध्ये कोयना धरणातून ३.८० टीएमसी व वारणा धरणातून ८.५८ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. कृष्णा नदीचा नियोजित पाणीवापर १८ टीएमसी असून, यामध्ये कोयना धरणातून १४.५९ टीएमसी, वारणा धरणातून ३ टीएमसी व पुनर्भरण ०.४१ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे. यामध्ये कोयना धरणातून ३२ टीएमसी, वारणा धरणातून ११.५८ टीएमसी, इतर स्त्रोत २.६४ टीएमसी व पुनर्भरण ०.४१ टीएमसी आहे.

त्याशिवाय, टेंभू योजनेतून २ टीएमसी, ताकारी योजनेतून ०.९० टीएमसी, म्हैसाळ योजनेतून ३ टीएमसी, कृष्णा नदी ३ टीएमसी अशी एकूण ८.९० टीएमसी अतिरीक्त पाणी मागणी आहे. कोयना धरणाच्या वार्षिक पाणी वापरातील ११.७१ टीएमसी अपेक्षित तूट आहे.

Sangli Drought Condition
Sangli Drought Condition : सांगलीकरांची पाण्यासाठी वणवण, ८२ पैकी ७० सिंचन प्रकल्प बंद, कोयनेतून विसर्ग कधी?

ताकारी –म्हैसाळ –टेंभू उपसा सिंचन योजनांचे आगामी नियोजन

ताकारी योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी २ आणि उन्हाळी २ अशी चार आवर्तने देण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. सन २०२३-२४ अंतर्गत खरीप (टंचाई) साठी एक आवर्तन दि. २३ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत याआधीच देण्यात आले आहे. तर दि. १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ आणि दि. १० जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रब्बीची दोन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच, दि. १५ मार्च ते २५ एप्रिल २०२४ आणि दि. १५ मे ते १५ जून २०२४ या कालावधीत दोन उन्हाळी आवर्तने देण्याचे निश्चित करण्यात आले.

तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून सन २०२३ – २४ अंतर्गत दि. १८ जुलै ते २० ऑक्टोबर या कालावधीत खरीप हंगामाचे एक आवर्तन पूर्ण करण्यात आले असून, दि. १ नोव्हेंबर २०२३ ते २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रब्बी हंगाम आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दि. १ मार्च ते ३० जून २०२४ या कालावधीत एक उन्हाळी आवर्तन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेतून सन २०२३ -२४ अंतर्गत रब्बीसाठी दि. १५ डिसेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत तर उन्हाळी आवर्तन दि. १ एप्रिल ते ३१ मे २०२४ या कालावधीत देण्याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान रब्बीसाठीचे आवर्तन लवकर सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com