Chana Cultivation : हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन

Chana Crop management : रब्बी हंगामातील हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. अनेक कोरडवाहू शेतकरी खरीप हंगामाअखेर पडलेल्या पावसाच्या ओलीचा फायदा घेत हरभरा पेरणी करतात.
 Chana Cultivation
Chana CultivationAgrowon
Published on
Updated on

Rabi Chana Crop : रब्बी हंगामातील हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. अनेक कोरडवाहू शेतकरी खरीप हंगामाअखेर पडलेल्या पावसाच्या ओलीचा फायदा घेत हरभरा पेरणी करतात. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी योग्य सिंचन व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन मिळवणे शक्य आहे. सिंचन व्यवस्थापनाची काही महत्त्वाची सूत्रे ः

उगवणीनंतर पहिले पाणी पीक कळीवर असताना (४० ते ४५ दिवसांनी), दुसरे पाणी घाटे भरतेवेळी (७० ते ७५ दिवसांनी) द्यावे. मर्यादित ओलीत असल्यास कमीत कमी एक ओलीत घाटे भरतेवेळी द्यावे.

रुंद वरंबा सरीमध्ये दोन ओळींत ओलीत केल्यास पाण्याची ३० टक्के बचत होते. उत्पादनात २० टक्के वाढ मिळते.

मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, कळी असताना दुसरे व घाटे भरतेवेळी तिसरे पाणी द्यावे. हलक्‍या जमिनीवर घेतलेल्या हरभऱ्याला मात्र पिकाची स्थिती पाहून उगवणीनंतर आवश्यकतेनुसार ओलीत करावे.

 Chana Cultivation
Chana Cultivation : हरभरा लागवडीसाठी निवडा सुधारित वाण

अधिक प्रमाणात पाणी दिल्यास पीक उभळण्याचा धोका असतो.

जमिनीचा प्रकार आणि खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. मात्र जमिनीस भेगा पडू देऊ नयेत. पाणी साचू देऊ नये.मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.

हरभरा पिकास एक ओलीत दिल्यास उत्पादनात ३० टक्के वाढ होते, तर दोन ओलीत दिल्यास ५२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते.

 Chana Cultivation
Chana Cultivation : हरभरा क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टरवर पोहोचण्याचे संकेत

तुषार सिंचन पद्धती फायदेशीर...

हरभरा हे पीक पाण्यास संवेदनशील पीक असून, साधारणपणे २५ सें.मी. पाण्याची आवश्यकता असते. सुधारित वाणाची लागवड करून त्याला तुषार सिंचनाची जोड दिल्यास उत्पादनात वाढ होते.

तुषार सिंचनामुळे पीक उभळण्याचा धोका कमी होतो. आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या टप्प्यावर पाणी देता येते. सारा, पाट, वरंबा यासारख्या पद्धतीने पाणी दिल्यास जमीन दाबून बसते. या पद्धती राबविण्यास मशागतीसह खर्चात वाढ होते. या पद्धतीमुळे जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. त्या तुलनेत तुषार सिंचनाने जमीन नेहमी भुसभुशीत राहते.

कोणतीही मशागत अतिशय सुलभ करता येते. तुषार सिंचनाने जमीन ओलावून मशागतीनंतर तिफण किंवा पाभरीच्या साह्याने काकऱ्या पाडल्या जातात. त्यात हरभरा बियाणे टोकण केल्यास पिकाची उगवण अतिशय चांगली होते.

पारंपरिक पाटपाणी पद्धतीने पाणी देताना अधिक पाणी दिले गेल्यास पाणी साचून मूळकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ही समस्या तुषार सिंचनाने पाणी अनेकदा विभागून देता येत असल्याने टळते. या पद्धतीत वाफसा स्थिती दीर्घकाळ टिकून राहते. परिणामी, पिकास दिलेली खते, अन्नद्रव्ये यांची उपलब्धता वाढते.

- संजय बडे, ७८८८२९७८५९

(सहायक प्राध्यापक, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com