Khandesh Water Scarcity : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

Water Crisis : जळगावातील गिरणा, धुळ्यातील पांझरा व नंदुरबारातील दरा, देहली प्रकल्पातील जलसाठ्यात या महिन्यात झपाट्याने घट झाली आहे.
Water Crisis
Water Scarcity Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहोचला असून, गावोगावी टंचाई वाढली आहे. जळगावातील गिरणा, धुळ्यातील पांझरा व नंदुरबारातील दरा, देहली प्रकल्पातील जलसाठ्यात या महिन्यात झपाट्याने घट झाली आहे. खानदेशातील एकूण जलसाठा २८ टक्क्यांपर्यंत आला आहे.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु या प्रकल्पाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागात अधिक आहे. २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे सिंचन या प्रकल्पातील जलसाठ्याच्या मदतीने करता येते. चाळीसगावातील मन्याड प्रकल्पात अल्प साठा आहे. पाचोऱ्यातील बहुळा, गिरणा पट्ट्यातील बहुळा, अग्नावती, भोकरबारी, पारोळ्यातील बोरी, एरंडोलातील अंजनी प्रकल्पातही जलसाठा घटला आहे.

गिरणा धरणातून रब्बीला पाणी देण्यात आले. दोन वेळेस नदीत टंचाई निवारणार्थ पाणी देण्यात आले आहे. तसेच उद्योगांनाही पाणी दिले जात आहे. चाळीसगाव, भडगाव व पाचोरा शहरास पिण्यासाठी पाणी दिले जात आहे.

Water Crisis
Water Crisis : अमळनेर तालुक्यात १४ गावांना पाण्याची टंचाई

यामुळे यातील जलसाठा २९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. खानदेशात काही प्रकल्पांत जलसाठा पावसाळ्यातही अल्प होता. काही प्रकल्प कोरडेठाक होते. यामुळे एकूण जलसाठा कमी होता. त्यात १०० टक्के भरलेल्या आणि अन्य प्रकल्पांतून पाणीउपसा सतत सुरू असल्याने एकूण जलसाठा चिंताजनक स्थितीत आहे.

Water Crisis
Wildlife Water Crisis : हरणांसह वन्यप्राण्यांसाठी टॅंकरने पाणवठ्यांमध्ये पाणी

१०० टक्के भरलेले प्रकल्प होताहेत रिकामे

जळगाव जिल्ह्यात जामनेरातील तोंडापूर, वाघूर, रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, गारबर्डी, चोपड्यातील गूळ, भुसावळनजीकचा तापी नदीवरील हतनूर हेच प्रकल्प १०० टक्के भरले होते. धुळ्यातील पांझरा व अनेर, नंदुरबारातील दरा व देहली हे मध्यम प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. परंतु त्यातील जलसाठाही निम्मे घटला आहे.

हतनूर प्रकल्पातून जळगावातील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर, भुसावळातील आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक विजप्रकल्पास पाणीपुरवठा होतो. तसेच यावल, रावेर व चोपड्यातील रब्बीसही तीन वेळेस आवर्तन देण्यात आले आहे. त्यातील जलसाठा ३७ टक्क्यांखाली आहे. वाघूर प्रकल्पातूनही जळगाव शहर, जामनेर शहर, लहान उद्योग, जळगाव व भुसावळातील काही गावांतील रब्बीसही पाणी देण्यात आले आहे. यातील जलसाठाही कमीच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com