Water Tankers: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व धाराशिव या चार जिल्ह्यांतील ६१ गावे व ४६ वाड्या सध्या टँकरवर अवलंबून आहेत. अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाईने डोके वर काढले असून, पाऊस न आल्यास ही स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे..प्राप्त माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ गावे व चार वाड्यांना २७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील १२ गावे व नऊ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे..Water Shortage Relief: मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गाव, वाड्यांची संख्या घटली .बीड जिल्ह्यातील २६ गावे व ३३ वाड्यांना टंचाईचा सामना करावा लागत असून, त्यासाठी ६८ टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत..Water Scarcity: भरपावसाळ्यात २५७ गावे, १३० वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा.धाराशिव जिल्ह्यातील सात गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, त्यासाठी नऊ टँकरची सोय करण्यात आली आहे. चारही जिल्ह्यांत सुमारे १२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, त्यामध्ये तीन शासकीय व १२३ खासगी टँकरचा समावेश आहे..४३५ विहिरींचे अधिग्रहणटँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी सुमारे ४३५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यातील २४, बीडमधील १७, लातूरमधील २१४ आणि धाराशिवमधील १८० विहिरींचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.