Mumbai News: ‘‘राज्यातील २४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतींसाठी आज (ता. २) मतदान होत असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत, असे जरी सांगितले जात असले तरी हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता. .मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते का,’’ असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. निवडणूक आयोगाचा सावळागोंधळ सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे..आज (ता. २) राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी मतदान होत आहे. मात्र एक दिवस आधीच काही नगरपंचायती नगरपरिषदा आणि काही प्रभागांमधील निवडणुका आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याने रद्द करण्यात आल्या आहेत..Maharashtra Politics: आश्चर्याचा धक्का! उमरग्यात शिंदेसेनेची चक्क काँग्रेसशी युती, 'बुडाखालील अंधार' म्हणत दानवेंचे टीकास्त्र.याबाबत बोलताना श्री. सपकाळ म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास १० वर्षांनंतर होत आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. ३ तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ३ तारखेचा निकालही २० तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा. आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत. हा कसला निवडणूक आयोग?.Local Bodies Result Date : नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल २१ डिसेंबर रोजी; नागपूर खंडपीठाचा आदेश .निवडणुका अचानक स्थगित करणे अयोग्य : रवींद्र चव्हाणमुंबई : ‘‘राज्यातील काही नगराध्यक्षपदाच्या व नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय बदलावा व पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणे घ्याव्यात,’’ अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आयोगाकडे निवेदनाद्वारे केली आहे..श्री. चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे, की नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून त्यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज (ता.२) मतदान होत आहे. मात्र यापैकी काही निवडणुका तांत्रिक मुद्याच्या आधारे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील २४ नगराध्यक्ष व २०४ नगरसेवकांची निवडणूक लांबणीवर पडली आहे. .नगरपालिका निवडणूक नियम १९६६, राज्य निवडणूक आयोगाचे ४ नोव्हेंबरचे सहपत्र आणि २९ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश यात समन्वयाचा अभाव आहे. ज्या ठिकाणी अपिलाचा निर्णय २६ नोव्हेंबरनंतर लागला असेल किंवा उमेदवार स्वत: शपथपत्र देत असल्यास या निवडणुका स्थगित न करता त्या पूर्वीच्याच कार्यक्रमाप्रमाणे घेण्यात याव्यात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.