Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Waiting for Dhanpur Dam Water : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या धनपूर (ता. तळोदा) धरणाचे काम अखेर गेल्या सात वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Nandurbar News : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या धनपूर (ता. तळोदा) धरणाचे काम अखेर गेल्या सात वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील २७२ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, मात्र केवळ पाटचारी नसल्यामुळे हे क्षेत्र अद्यापही तहानलेलेच राहिले आहे. बोरद परिसरातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते.

प्रत्यक्षात मात्र आजघडीला मोजक्याच गावांना या धरणाचा लाभ होताना दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी (ता. १) जुलै १९९७ ला नंदुरबार जिल्हानिर्मितीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारेमंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित असताना स्वर्गीय पी. के. अण्णा पाटील यांनी धरपूर धरणाचा प्रस्ताव त्यांना सादर करून या विषयाला चालना दिली होती.

Water Stock
Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

जून २०१७ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कळमसरा, धनपूर, सिलिंगपूर, खर्डी लाखापूर फॉरेस्ट, न्यूबन, छो. धनपूर, राणीपूर इत्यादी गावांतील साधारणतः २७२ हेक्टर शेतजमीनही ओलिताखाली येणार हे स्पष्ट झाले होते.

या परिसरातील शेती बागायती होणार आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखी आणि समाधानी होईल व त्यांच्या उत्पन्नात भरघोस अशी वाढ होईल हे ठासून लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले होते. परंतु सात वर्षांचा कालावधी लोटला असून, शेतापर्यंत पाणी पोहोचलेच नाही.

Water Stock
Water Conservation : बुलडाणा जिल्ह्यात १७७ जलाशये घेणार मोकळा श्‍वास

हा परिसर पूर्णपणे आदिवासी भागातील असल्याने सातपुड्यावर राहणारा आदिवासी बंधू त्यांच्या परिसरात झालेला धरणामुळे समृद्ध होईल व शेतातील उत्पन्नवाढ झाल्यावर मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देईल. यासाठी धनपूर धरण हे या परिसरातील आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनेल आणि त्यांच्या जमिनी संदर्भातील पाण्याची समस्या कायमची सुटेल हाच यामागचा उद्देश होता मात्र अजूनही हा उद्देश सफल झाला नाही.

कूपनलिकांच्या जलपातळीत वाढ

धरणाच्या बाबतीत माहिती घेतली असता या धरणाची लांबी साधारणतः ४२२ मीटर असून, उंची २०.१८ मीटर, तर खोली १६० मीटर आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात धरणाचे पाणी निझरा नदीत सोडण्यात येते. या धरणामुळे परिसरातील कूपनलिकांमध्ये पाण्याची पातळी वाढणार, असे सांगण्यात आले आणि प्रत्यक्षात धरणामुळे परिसरातील काही कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत बरीचशी वाढ झाली.

स्वर्गीय कॉ. जयसिंग माळी यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समितीतर्फे पाटचारीसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; परंतु २०२४ उजाडले तरी अद्यापही पाटचाऱ्यांचा प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे धरणाच्या साठलेल्या पाण्याच्या माध्यमातून जमिनीत जेवढे पाणी मुरते, तेवढ्याच पाण्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या कूपनलिकांच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकांची तहान भागवावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com