Economic Challenges Faced by Farmers: भारतात १९७५ मध्ये आणीबाणी लागली. शेतीमालाचे भाव पडले पण बोंब नाही. १९७४-७५, १९७५-७६, १९७६-७७ शेतीमालाच्या हमीभावात वाढच झाली नाही. कापूस एकाधिकार योजनेत कापसाचे चुकारे (पैसे) मिळाले नाही, काहीही बोंब नाही. त्या वेळेस मी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या गळ्यात नागपूर विमानतळावर कापसाच्या बोंडाचा हार घालून कापसाचे चुकारे द्या, ही मागणी केली. आणीबाणीत असा विरोध करणे धोक्याचे होते. या काळातच स्व. संजय गांधी व श्रीमती मेनका गांधी पवनारला स्व. विनोबाजींच्या भेटीला आले होते. .या वेळेस मी विनोबाजींना एक पत्र लिहिले होते. त्यात मी विनोबाजींना विनंती केली होती, की त्यांनी स्व. संजय गांधी यांना आदेश द्यावा, की गावात ५० एकर जमीन घेऊन कसे जगायचे व मजुरांची मजुरी कशी वाढवायची, हे करून दाखवावे. कारण मला विनोबाजींवर राग होता की यांनी भूदानाच्या माध्यमातून गावाच्या संपत्तीचे वाटप केले पण शहरी संपत्तीचे काय? शेतीमालाचे भाव वाढवले नाही तर मजुरी कशी वाढणार?.या रागापोटी हे पत्र लिहिले होते. पण नंतर जेव्हा विनोबाजींचे साहित्य वाचले तेव्हा हे लक्षात आले, की विनोबाजींनी फक्त भूदान देणे नाहीतर त्यांनी शेतीमालाच्या भावाचा प्रश्न पण मांडला होता. विनोबांनी बिहारमध्ये एका गावांत भाषण करताना असे म्हटले होते, की शेतजमीन देऊन प्रश्न सुटणार नाही तर भावातील एकतेची जरुरी आहे. कारण शहरातील सर्व गरजांची पूर्तता गावातून होते पण त्याचे भाव ठरविण्याचा अधिकार गावाला नाही..Farmer Crisis: घटते क्षेत्र, वाढती चिंता.म्हणजेच शेतीमालाला भाव कोणी मागितला तर विनोबांनी! पुढे ते असं म्हणतात, की शहरातील लोकांना आपल्याला उपाशी मारायचे नाही. आपण ८० टक्के आहोत आपण त्यांना सांगू आम्ही ८० टक्के गावात ठेवू व २० टक्के शहरांना देऊ. अर्थशास्त्राचा मागणी आणि पुरवठा नियम आहे. स्वतंत्र भारतात झाले याच्या उलटेच. गावातील पोरांना दूध नाही पण शहरात दूध-दही, आइस्क्रीम भरपूर आहे..मजुरांच्या मजुरीबद्दलचा गांधी-विनोबा यांचा एक संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. पण त्यावर कधीच गंभीरपणे चर्चा झालीच नाही. विनोबा म्हणयाचे, की मी इतके चांगले सूत काततो व एका बैठकीत ७-८ तास काम करतो. पण मला या सुताचे २ ते ३ आणे (३० नवे पैसे) मिळतात. यातच ते जगण्याचा प्रयत्न करायचे. एकदा महात्मा गांधी म्हणाले, की सूत कातण्याला कमीत कमी मजुरी आठ आणे (५० पैसे) मिळाले पाहिजे. खादी महाग झाली तर हरकत नाही. यावर विनोबांची प्रतिक्रिया होती. आज बाबा (विनोबा) खुश हुआ कारण आता मला आठ आणे मिळणार! याचाच अर्थ शेतीमालाचे भाव वाढले तर हरकत नाही पण शेतमजुरांची मजुरी वाढलीच पाहिजे..विनोबा एका ठिकाणी म्हणतात, ‘‘ज्या वस्तू शेतकरी गावकरी तयार करतात त्या सर्वांनी महाग विकत घेतल्या पाहिजे व ज्या शेतकऱ्यांना लागतात त्या स्वस्त असल्या पाहिजे.’’ वास्तवात दूध महाग पाहिजे पण ते स्वस्त आहे. ग्लास स्वस्त पाहिजे ते महाग आहे. ज्या देशात ७५ टक्के लोक गावात राहतात. शेती व्यवसायावर जगतात त्या देशात दूध, खादी, धान्य स्वस्त ठेवून देश सुखी कसा होणार?) ज्या मोजक्या लोकांना नियमीत चांगले वेतन मिळते त्यांचाच फक्त विचार करून चालणार नाही, हे त्यांनी स्पष्ट पणे सांगितले होते..Agriculture Labour Crisis: मजूर समस्या : शेतीत वानवा, शहरात शोषण.शेतीची लूटगांधीवादी यंत्राचा विरोध करतात, त्यावर विनोबा म्हणायचे आम्ही यंत्राचा विरोध करणारे नाही. आमचे म्हणणे आहे, की यंत्राणे तयार झालेली वस्तू स्वस्त व श्रमाने तयार झालेले वस्तू महाग असली पाहिजे. हाच गांधी विचार राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी, ‘कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने द्यावे’ या सोप्या शब्दात मांडला. हीच शेतकऱ्यांची लूट महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांच्या आसूड’मध्ये विस्ताराने गोऱ्या इंग्रज सरकार पुढे मांडली होती. पण ही वास्तविकता आहे, की यासर्व विचारांची दखल स्वतंत्र भारताच्या राजकारण-अर्थकारण-समाजकारणात ज्या गंभीरतेने घ्यायला हवी होती ते झाले नाही. इंग्रजांनी त्यांच्या देशाच्या विकासासाठी आपल्या देशाची लूट केली तशीच स्वतंत्र भारतात देखील शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे..इंग्रजांच्या काळात शेतीची लूट जमीनदारी जहागीरदारीच्या माध्यमातून मजबूत करण्यात आली होती. मी शेतकरी संघटनेच्या मंचावरून जाहीरपणे बोलायचो, माझ्या आजोबांकडे १२०० एकर जमीन आली कशी? त्याचे उत्तर सोपे आहे, आमचे आजोना-पंजोबा गावात सावकार होते. इंग्रजांनी नगदीत वायदा वसुली सुरू केली तेव्हा शेतकऱ्यांजवळ नगदी पैसे राहत नसत ते सावकाराकडून कर्ज घ्यायचे, ते कर्ज परत करता येत नव्हते. जमिनी सावकाराकडे जायच्या, अशी जमीन आमच्याकडे आली. जेव्हा सावकारी बंद पडली तेव्हा आमचे आजोबा जमीन विकून जगले. (मी पण ६० एकर जमीन विकून नागपूरला घर व कार विकत घेतली. शेती करून नाही.).स्वतंत्र भारतात गावाच्या लुटीचे धोरण बदलवून गावाचा विकास खऱ्या अर्थाने स्वराज्य तयार होईल, ही आशा निराशेत बदलली. विनोबांनी स्वतंत्र भारत कशासाठी, याची फार सुंदर व्याख्या केली आहे. विनोबा भावे म्हणातात, हा देश स्वतंत्र गावांचा स्वतंत्र देश होता. मुगल आले तेव्हा हा स्वतंत्र गावांचा गुलाम देश झाला. इंग्रज आले तेव्हा हा गुलाम गावाचा गुलाम देश झाला. आम्हाला हा देश स्वतंत्र गावांचा स्वतंत्र देश करावयाचा आहे. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला. पण गाव आजही गुलाम आहेत. याचे कारण इंग्लंडचा विकास कच्चा मालाच्या व श्रम शक्तीच्या लुटीवर होता. स्वतंत्र भारतात श्रम शक्तीच्या लुटीच्या विरोधात आंदोलन झाले..पण कच्चा मालाची लूट मागे पडली. मार्क्सचे म्हणणे महत्त्वाचे ठरते, की श्रमशक्तीच्या लुटीतून भांडवल संचय होतो पण गांधीवाद किंवा रोझ लुक्झेम्बर्गचा विचार, कच्चा मालाच्या लुटीतून ही भांडवल संचय होतो मागे पडला. कारखान्यातील कामगार-सरकारी नोकर संगठित झाले. त्यांचे वेतन-पेन्शन सोई सवलती वाढल्या तर दुसरीकडे गावातील जमीन मालक शेतकरी हा शोषक आहे, असा प्रचार करून शेतजमीन धारण कराण्यावर सीलिंगचा कायदा आला. शेतकरी अल्पभुधारक झाले. संघर्ष करण्याची शक्ती राहीली नाही. जुनी म्हण अशी होती ‘उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ट नोकरी.’ आज उत्तम नोकरी मध्यम व्यापार कनिष्ठ शेती अशी स्थिती झाली आहे..विनोबांनी हाच विचार, पैसा लफंगा आहे असं म्हणून मांडले होते. ही लफंगेगिरी समजण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्र समजून घ्यावे लागेल. सोपे करण्यासाठी एकच उदाहरण देतो. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाले. त्या वेळी त्यांच्या कार चालकाचा पगार किती होता व आज किती आहे या तुलनेत शेतमजुरांची मजूरी वाढली का? ती हिशेबात घेऊन शेतीमालाचे भाव आहेत का? याचे उत्तर नाही, असे आहे. म्हणूनच आज उत्तम शेती कनिष्ठ झाली व कनिष्ठ नोकरी उत्तम झाली. ९४२१७२७९९८(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.